Farmer spraying esakal
नाशिक

Agriculture News : वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार; पिकांवर 2 दिवसाआड औषध फवारणी

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : शहरासह परिसरातील ग्रामीण भागात सतत बदलणाऱ्या वातावरणाचा कांदा पीकाला बसत असून थंडीचा वाढलेला जोर आणि पहाटे पडणाऱ्या धुके व दवबिंदू मुळे कांद्यावर रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याची भिती वाढली आहे.

यामुळे दर दोन ते तीन दिवसाआड शेतकऱ्यांना पीकावंर फवारणी करावी लागत आहे. यासाठी महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याने फवारणीच्या अधिक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अचानक हवामानात झालेला बदल आणि त्या अनुषंगाने रोगांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मनमाड शहरासह ग्रामीण भागातील पीक सध्या धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी केली जात आहे. कांदा, गहू, हरभरा आदी पिके जोमात आहे.

अगोदर परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत आहे हातातोंडाशी आलेली पिके वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच आता मात्र गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने तसेच पहाटे पडणाऱ्या धुके व दवबिंदू यामुळे कांद्यावर रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याची भीती वाढली आहे.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

रोपांच्या वाढीवर परिणाम

पहाटेच्या वेळेस दाट धुके पडत आहे, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवड केलेला कांदा पोसण्यास सुरू झालेली असतानाच वातावरणात बदल झाल्याने कांद्यावर रोग पडू लागला आहे.

यामुळे रोपांची वाढही खुंटली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी सध्या परिसरातील शेतकरी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT