prakash jawdekar sakal
नाशिक

सुशासनाचा पाया अटलजींचा, तर मोदींचा कळस : जावडेकर

स्वातंत्र्यानंतर ज्यांनी कधी रस्ते पाहिले नाही, अशा गावांत पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते पोचले.

सकाळ वृत्तसेवा

स्वातंत्र्यानंतर ज्यांनी कधी रस्ते पाहिले नाही, अशा गावांत पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते पोचले.

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे(bjp) पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी(atal bihari wajpayee) यांनी देशात सुशासनाचा पाया रचला. आता नरेंद्र मोदी(narendra modi) त्यावर कळस चढवीत आहेत. नव्या भारतात सुशासनातून अद्‌भुत असे काम उभे राहिले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर(prakash jawdekar) यांनी केले.भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुशासन दिवस याविषयावर माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. श्री. जावडेकर म्हणाले, की वाजपेयींचे नेतृत्व प्रभाव टाकणारे होते.

वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील रस्ते सुधारले. स्वातंत्र्यानंतर ज्यांनी कधी रस्ते पाहिले नाही, अशा गावांत पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते पोचले. मोबाईल, विमानसेवेतील क्रांती त्यांच्याच काळात झाली. जगभरात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. त्याचे श्रेय सुशासनाला अर्थात, वाजपेयी यांच्या दूरदृष्टीला जाते. सध्या देशात वीस लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. आधार लिंकमुळे रेशनची चोरी थांबली. बॅंकांमध्ये थेट अनुदान जमा होऊ लागल्याने लाभार्थ्यांपर्यंत अनुदानाची संपूर्ण रक्कम पोचली. शिष्यवृत्ती, निवृत्तिवेतनाचा घोळ संपून थेट बॅंकेत पैसे जमा होत आहेत. काँग्रेसने एका योजनेत ७० हजार कोटी रुपये माफ केले होते.

परंतु, पंतप्रधान मोदी यांनी सात लाख कोटी रुपयांचे वाटप केले. डिजिटल क्रांतीमुळे सुशासनाला बळ मिळाले. कामात पारदर्शकता आली. गरिबांना घर मिळाले, कोविडच्या काळात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या दोन लशी भारताला मिळाल्या. विरोधकांनी मोदींना त्यावरून लक्ष केले. अपप्रचारानंतर मोदींनी स्वत: लस घेत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. कोरोनाकाळात घराबाहेर विरोधी पक्ष पडला नाही. भाजप कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरून रुग्णांना मदत करत होते. असे अद्भुत काम सुशासनामुळेच शक्य होत असल्याचे जावडेकर म्हणाले. भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, विजय साने, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

इघेंचा खून राजकीय

सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या राजकीय खून आहे. भाजप कार्यकर्ते सर्व क्षेत्रात चांगले काम करत असल्याने त्यांना अद्दल घडविण्यासाठी खून केले जात आहेत. खुनाच्या चौकशीचे काय झाले, याचा जाब महाविकास आघाडी सरकारला विचारला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने कितीही दबाव आणला, तरी भाजपने सत्ताकाळात केलेल्या विकासकामांमुळे विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply : सूस, म्हाळुंगेचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; मुळशीतून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला राज्याची तत्त्वतः मान्यता

Best Maharashtrian breakfast in Mumbai : मुंबईची मराठमोळी चव; ११६ वर्षांची परंपरा आणि 'मामा काणे' यांच्या बटाटा वड्याची रंजक गाथा!

Sister Midnight Movie Analysis : ‘सिस्टर मिडनाइट’ चित्रपटाचा स्त्री मुक्ततेच्या शोधातील अस्वस्थ प्रवास

Water Scheme Issue : पाणी योजनेला संथ गती; जलवाहिन्या, पंपिंग स्टेशन, टाक्‍यांची कामे अपूर्ण

BMC Election: बीएमसी रणांगणात महायुतीचा मास्टरप्लॅन! भाजप आणि शिंदेसेनेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; कोण किती जागा लढवणार?

SCROLL FOR NEXT