Nashik District Collector Gangatharan D. esakal
नाशिक

Nashik News: दोन दिवसांत अवकाळीचे पंचनामे पूर्ण - गंगाथरन डी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ३२३ गावातील चार हजारांच्या आसपास शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण होतील.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे दोन कोटींची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.

नाशिक जिल्ह्याला गेल्या आठवड्यात अवकाळीने दणका दिला. शुक्रवारपासून (ता.२४) पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २३) पुन्हा पंचनाम्यांचा आढावा घेतला. तसेच, वेळेत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कामे गतीने सुरू आहेत. आतापर्यंत साधारण ५ दिवसांचे पंचनामे बाकी आहेत. ५ ते ८ मार्च दरम्यान झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी २ कोटी ५८ लाखांची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. अद्यापही पिकांचे पंचनामे करण्याची कामे सुरु आहे. येत्या दोन दिवसांत पंचनाम्याची कामे पूर्णत्वास जातील.

जिल्ह्यात ३२३ गावातील तीन हजार ९४६ शेतकऱ्यांच्या पिकाला अवकाळी पावसाचा दणका बसला. अवकाळी पावसामुळे साधारण सतराशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे आतापर्यंत पुढे येत आहे. त्यात, निफाड एक हजार ३५५ तर त्यानंतर नाशिक तालुक्यातील २२९ हेक्टरचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT