Bharati Dighole esakal
नाशिक

Bharat Dighole : नाफेडकडून कांदा खरेदी सुरू होणे आवश्यक : भारत दिघोळे

सकाळ वृत्तसेवा

Bharat Dighole : नाफेडकडून १५ मेपासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू केली जाईल यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्र दिले होते.

प्रत्यक्षात मात्र नाफेडकडून अजूनही महाराष्ट्रात कुठेही कांदा खरेदी सुरू झालेली नसून नाफेडची प्रत्यक्ष कांदा खरेदी व्हावी याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. (Bharat Dighole statement Onion purchase from NAFED must start nashik news)

नाफेड कांदा खरेदीबाबत अजून कोणतीही स्पष्टता नसून बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी दोन रुपयांपासून सहा रुपये प्रति किलोचा निच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल प्रचंड संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत.

याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सरकार दरबारी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर स्वतः केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी एप्रिल महिन्यातच नाफेडकडून यंदा तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केली जाईल असे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते.

स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी नाफेड कांदा खरेदीबाबत घोषणा करूनही प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू होत नाही हे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासारखे आहे. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत बघू नये.

अतिवृष्टी, गारपीट अवकाळी पावसामुळे राज्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सध्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशा परिस्थितीमध्ये नाफेडकडून कांदा खरेदी सुरू होणे अत्यंत गरजेचे असून नाफेडने ही कांदा खरेदी थेट बाजार समितीमध्ये उतरून करावी. व्यापारी खरेदी व नाफेडच्या खरेदीमध्ये स्पर्धात्मक लिलाव होऊन शेतकऱ्यांना अधिकचा दर कसा मिळेल यासाठी भारती पवार यांनी प्रयत्न करावे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला असून सध्या कांद्याला मिळणाऱ्या दरामध्ये शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

तत्काळ शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी सुरू न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना घेराव घातला जाईल असा इशारा श्री. दिघोळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT