brain 1.png
brain 1.png 
नाशिक

उतारवयातील स्मृतीभ्रंशवर होतोय 'याचा' उपयोग..वजन कमी करण्यापासून ते हृदयासाठी उपयुक्त 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नारळाच्या तेलाचा वापर नेमका कशासाठी होतोय, याची माहिती आयुर्वेद तज्ज्ञांकडून घेतल्यानंतर उतारवयातील स्मृतीभ्रंशवर नारळाच्या व्हर्जीन तेलाच्या कॅप्सूल उपयोगात आणल्या जात असल्याची माहिती उपलब्ध झाली. कोरोना प्रतिबंधासाठी नारळ उपयुक्त ठरत असल्याची बाब संशोधकांच्या प्राथमिक अंदाजातून पुढे आली. तसे नारळाचे तेल, खाद्यपदार्थमधील नारळाचा उपयोग याबद्दल नाशिककरांमध्ये चर्चेला सुरवात झाली. फिलिपीन्समध्ये नारळाची झाडे अधिक असल्याने नारळाबद्दल संशोधकांमध्ये असलेली उत्सुकता महत्त्वाची मानली जात आहे. 

वजन कमी करण्यापासून ते हृदयासाठी उपयुक्त 

केरळमध्ये स्वयंपाकात नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. मात्र संशोधकांना अभिप्रेत असलेले नारळाचे व्हर्जीन तेल आहे. स्मृतीभ्रंशवर इलाज म्हणून नारळाच्या व्हर्जीन तेलापासून केल्या जाणाऱ्या कॅप्सूल परदेशातून आणल्या जातात. ऑनलाइन मार्केटमध्ये या कॅप्सूलची किंमत तपासून पाहिल्यावर पाचशे मिलिग्रॅमच्या 120 कॅप्सूल सतराशे रुपयांना, 60 कॅप्सूल 750 रुपयांना, एक हजार मिलिग्रॅमच्या 60 कॅप्सूल दीड हजार रुपयांना अशा किमती ऑनलाइन मार्केटमध्ये आढळून आल्या आहेत. याशिवाय नारळाचे व्हर्जीन तेल 600 रुपये लिटरपासून ते सोळाशे रुपये लिटरपर्यंत असल्याचे पाहायला मिळते. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार तेल किती घ्यायचे हे ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. दिवसाला सकाळ आणि सायंकाळ एक ते दोन चमचे तेल तोंडावाटे घेण्यासाठी प्रमाण असल्याची माहिती उपलब्ध झाली. मात्र या तेलासंबंधी आयुर्वेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे. 

आयुर्वेदिक महत्त्व 
- त्वचा, केस, दातांना व्हर्जीन नारळ तेल उपयुक्त 
- एमसीटी हृदयातून जाऊन ऊर्जावृद्धी करते 
- मुलांमधील फिटवर गुणकारी आहे 
- भूक कमी करून वजन घटवण्यास मदत करते 

(संपादन - ज्योती देवरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT