rabbbi.png 
नाशिक

राज्यात यंदा रब्बी क्षेत्रामध्ये १४ टक्क्यांनी वाढ; २२ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरणी

महेंद्र महाजन

नाशिक : राज्यात वरुणराजाने केलेल्या मेहेरबानीचे चांगले परिणाम रब्बी हंगामात दिसून येताहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत रब्बीच्या क्षेत्रात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ५१ लाख २० हजार हेक्टरपैकी गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात १५ लाख २० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी उरकली होती. यंदा आतापर्यंत २२ लाख ३३ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. यंदा रब्बीचे पेरणी क्षेत्र ४३.६२ टक्क्यांपर्यंत पोचले आहे.

रब्बीच्या झालेल्या पेरणीची टक्केवारी

रब्बी ज्वारीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत एक लाख हेक्टरने वाढले आहे. मक्याची लागवड ३९ हजार हेक्टरने अधिक झाली आहे. हरभरा लागवडीखालील क्षेत्र आठ लाख ३८ हजार हेक्टरच्यापुढे गेले असून, ते गेल्या वर्षीच्या तुलनेत चार लाख ७७ हजार हेक्टरहून अधिक आहे. शिवाय करडई, जवस, तीळ, सूर्यफूल क्षेत्रात वाढ झाली आहे. विभागनिहाय या आठवड्याच्या सुरवातीपर्यंत रब्बीच्या झालेल्या पेरणीची टक्केवारी अशी ः कोकण- २१.५९, नाशिक- १८.३०, पुणे- ४२.४२, कोल्हापूर- ५८.४०, औरंगाबाद- ६३.८२, लातूर- ४९.१८, अमरावती- ४०.५४, नागपूर- २०.२७.

वाचलेल्या खरीप पिकांची स्थिती

अवकाळी पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या खरीप हंगामातील राज्यामधील भात व नाचणीची पिके पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकांची काढणी सुरू आहे. ज्वारीची काढणी पूर्णत्वाकडे गेली आहे. कापसाला बोंडे लागण्यापासून ती पक्वतेच्या अवस्थेत असून, वेचणी सुरू झाली आहे. तूर फुलोरा ते शेंगा व शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. राज्यात काही ठिकाणी कापसावर अमेरिकन बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मक्यावर लष्करी अळीचा, तर तुरीवर घाटे अळी आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

४१ लाख हेक्टरचे नुकसान

जून ते ऑक्टोबरदरम्यान राज्यात झालेली अतिवृष्टी, पुरामुळे ३४ जिल्ह्यांतील नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने ५ नोव्हेंबरला तयार केला आहे. त्यानुसार ४१ लाख ४१ हजार २२१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यात पिकांच्या जोडीला फळबागांचा समावेश आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT