नाशिक

Nashik : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवा

जिल्हा शेतकरी संघटनेचे सहकारमंत्री अतुल सावे यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : जिल्हा बॅक, सोसायटी आणि राष्ट्रीयकृत बॅंका शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहेत. गतवर्षी कमी झालेले उत्पन्न आणि यंदा तर शेतीची पावसामुळे लागलेली वाट पाहता जगावे कसे असा प्रश्‍न बळीराजापुढे असताना त्यांच्यामागे कर्जवसुलीची भुणभुण लागली आहे. वसुलीसाठी प्रसंगी त्याच्या जमिनीचा लिलाव करण्यासाठी परवानगी मागितली जात आहे. अशा स्थितीत त्याला आधार देण्यासाठी सर्व कर्जवसुलीला स्थगिती द्यावी असे साकडे नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने सहकारमंत्री अतुल सावे यांना घातले.

नाशिक जिल्हा शेतकरी व शेतकरी संघटना (स्व. शरद जोशी प्रणित) जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे व जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.१) सहकारमंत्री अतुल मोरेश्वर सावे यांची मुंबई येथे भेट घेत जिल्हा बँक थकबाकीदार शेतकऱ्यांची वसुलीविषयी अवगत करण्यात आले.

नोटबंदी, नंतर कोरोना आणि यंदा अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही संकटे सोसण्याची बळीराजाची सहनशक्ती संपली आहे. पीकविमा काढलेल्यांना विम्याचे हप्तेही मिळालेले नाहीत. शासन सतत शेतीमालावर निर्यात बंदी लावून व शेतीमाल आयात करून शेतीमालाचे भाव हेतुपुरस्सर पाडत आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही.

यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू व इतर पिकांचे भरपूर नुकसान झाले आहे. तोडणीस आलेली द्राक्ष पावसामुळे क्रॅकिंग होऊन द्राक्षबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. द्राक्ष पिकांचे पंचनामे चालू आहेत. शेतकरी कर्जबाजारी होऊन हताश झाला आहे. त्याच्या हातात पैसा आलेला नाही हे शासनाच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसानभरपाई दिलेली आहे.

आजही शेतकरी भरपाई मागत आहे. अशा परिस्थितीत सोसायटी व बँका कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून त्यावर जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी परवानगी मागून लिलाव करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागत आहे. ही शेतकऱ्यांसाठी गंभीर बाब आहे. शासनाने शेतकऱ्यांना ताबडतोब कोर्ट वसुलीच्या माध्यमातून कर्जवसुली थांबवावी. जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, प्रदीप पवार, एकनाथ धनवटे, भिमराव बोराडे, बाळासाहेब गायकवाड सुनील भंडारे, आनंदा गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हा बॅंकेकडून चौपट वसुली

जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतजमिनीचे मूल्यांकन करून जमिनी जप्त करून सध्या राष्ट्रीयकृत बँका मुद्दलाच्या ५० टक्के कर्जवसुली करून संपूर्ण व्याज माफी देऊन एक रकमी वसुली करत आहेत. अशा पद्धतीने जिल्हा बँकेने पण राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे व्याजात सूट देऊन एक रकमी कर्ज वसुली करावी.

मात्र जिल्हा बँक मुद्दलाच्या ४ पट व्याज लावून वसुली करत आहे. आपण यात लक्ष घालून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल. बिगरशेती कर्जाच्या वसुलीबाबत बँक कारवाई करत नाही. संचालकांकडून वसुलीला स्थगिती मिळाली. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती द्यावी. बँक शेतकऱ्यांच्या ७/१२ वर नाव लावून शेतकऱ्यांना अजून अडचणीत आणत आहे, हे त्वरित थांबवावे. मुद्दला इतकेच व्याज आकारावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT