Water Tap Sakal
नाशिक

Drinking Water Crisis : 24 तासाचे सोडा, सिन्नरला 4 दिवसाआडही पाणी नाही

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : शहरवासीयांना निवडणूक काळात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु चोवीस तास सोडा चार दिवस उलटूनही शहरातील उपनगरात पाणीपुरवठा होत नाही.

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून विस्कळित असलेला पाणीपुरवठा दैनंदिन करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे.

सिन्नरमध्ये काही दिवसांपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. नंतर त्याचा कालावधी हा वाढत जाऊन तो आता चार दिवसाआड झाला आहे. त्यामुळे करदाते नागरिक नागरिक हैराण झाले आहे. नगरपालिकेकडून ३६५ दिवसांची पाणीपट्टी घेतली जात

असली तरी वर्षभरात प्रत्यक्षात १३० ते १४० दिवसच पाणीपुरवठा होत आहे. त्यात वारंवार जलवाहिनी फुटणे, त्यात आणखी पाच सहा दिवस जातात. नागरिकांना पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यानंतरही होणारा पाणीपुरवठा हा अत्यल्प असल्याने नागरिकांना अधूनमधून पाण्याचे टॅंकर विकत घ्यावे लागते.

नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट येऊन सव्वा वर्षाचा कालावधी लोटला आहे. प्रशासक नियुक्त होऊनही पाणीपुरवठ्यातील अनियमितता हा मागील पानावरून पुढे चालू असाच आहे असा आरोप श्री. कोतवाल यांनी करून तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरतील.

तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी श्री.कोतवाल यांनी केली आहे. मागणीचे निवेदन मुख्याधिकारींना देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT