Rajgira
Rajgira Sakal
नाशिक

Rajgira : आरोग्यदायी राजगिरा खातोय भाव; परदेशातून प्रचंड मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - उपवासासाठी आवर्जून मागणी असलेला राजगिऱ्याच्या दरांत वाढ झाली आहे. अर्थात केवळ श्रावण महिन्यामुळे ही दरवाढ झालेली नाही. २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून, यामध्ये राजगिऱ्याचा समावेश आहे.

त्यामुळे जगभरातून त्याची मागणी वाढली आहे. देशातून याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहे. यामुळे देशात जरी राजगिऱ्याची टंचाई झालेली नसली, तरी दरांत मात्र मोठी वाढ झाली आहे.

राजगिऱ्याचा आहारात वापर उपवासाच्या दिवसांमध्ये केला जातो. त्यापासून लाडू तयार केले जातात. राजगिऱ्याच्या पीठापासूनही अनेक पदार्थ बनविले जातात. विशेषत: अलीकडे शारीरिक सदृढतेसह वजन कमी करण्यासाठीही आहारात राजगिरा वापरला जातो. राजगिऱ्यात अनेक घटक समाविष्ट असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये मागणीही वाढली आहे. उपवासाच्या काळात राजगिऱ्यापासून बनविल्या जाणाऱ्या लाडूंना विशेष मागणी असते.

दरम्यान, २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग, कर्करोग, अशक्तपणा यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी आहारात तृणधान्यांचा समावेश असावा यासाठी जागतिक पातळीवर आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

तिपटीने वाढ

चांगल्या प्रतीच्या राजगिऱ्याचा सध्या दर सध्या प्रतिकिलो १५५ रुपये असून, यात सुमारे ६० ते ६५ रुपयांची वाढ झालेली आहे. तर, राजगिऱ्याच्या पिठाचे दरही कडाडले असून, ते प्रतिकिलो २६० ते ३०० रुपये झाले आहेत. होलसेलमध्येच राजगिऱ्याचे दर तिपटीने वाढले आहेत. राजगिऱ्याच्या लाडूचे दर हे पॅकेटनुसार असतात. परंतु त्यातही किरकोळ वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT