gilke.jpg 
नाशिक

काय सांगता! गिलके, दोडके एक रुपया, तर काकडी दोन रुपये किलो? 

राम खुर्दळ

गिरणारे (नाशिक) : पालेभाज्यांचे भाव बाजार समितीत घसरले आहे. गिलके, दोडके एक रुपये किलो दराने जाळी (२० किलो) २० रुपयाने, तर काकडीला दोन रुपये किलो भाव मिळाला. शेतकऱ्यांचे पीक रुपया आणि दोन रुपये दराने विकले जात असतील तर केंद्राचे बाजारमूल्य कुठं गेलं? असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आधी कोरोना आता अवकाळी 
कोरोना लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पाऊस, सातत्याने पिकांवरील रोगराई, तसेच मार्केट काही काळ बंद असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पश्‍चिम पट्ट्यात भात पिकाची वाताहात झाली आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असताना आता टोमॅटो, द्राक्ष पिकांवर अवकाळी परतीच्या पावसात नुकसान केले. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी भाजीपाला पिकांचा आधार होता; पण तयार भाजीपाल्याचे भाव बघता दोन दिवसांपासून नाशिक बाजार समितीच्या उपबाजारात भाजीपाला मातीमोल भावाने विकला जातो आहे. भाजीपाला मार्केटपर्यंत आणण्याचा खर्चही भाजीपाला विकून मिळत नाही, अशी स्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

गिलके, दोडके एक रुपया, तर काकडी दोन रुपये किलो?

पालेभाज्यांचे भाव बाजार समितीत घसरले आहे. गिलके, दोडके एक रुपये किलो दराने जाळी (२० किलो) २० रुपयाने, तर काकडीला दोन रुपये किलो भाव मिळाला. काकडीची प्रत्येक जाळी (२० किलो) केवळ ४० रुपये भावाने विकली गेली. उत्पादनखर्च तर दूर; पण शेतातून तोडायला माल परवडत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांत संताप आहे. 

आंदोलनाचा इशारा 
कोरोनात आर्थिक संकटात, नैसर्गिक संकटात मोडून पडलेल्या शेतकऱ्यांनी शेतीत मोठ्या कष्टाने, कर्ज, उसनवारी करून भाजीपाला पीक घेतली आहेत. दिवाळीच्या हंगामात आता माहेरी आलेल्या 
लेकी-बहिणींना सणाचे गोडधोड करण्याची कुवत शेतकऱ्यांची राहिलेली नाही. किमान बाजारमूल्यही मिळत नाही. आज काकडी, गिलके, वांगे मातीमोल विकायचे का? शेतकऱ्यांचे पीक रुपया आणि दोन रुपये दराने विकले जात असतील तर केंद्राचे बाजारमूल्य कुठं गेलं? असा प्रश्‍न करीत शेतकरी संघर्ष संघटनेने महामार्गावर भाजीपाला टाकून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

 
भाजीपाला आग्रा रोडवर टाकून आंदोलनाचा इशारा दिला. शेतकऱ्यांबाबत आंधळ्या-बहिऱ्याचे सोंग घेणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणी कळणार नाही. -नाना बच्छाव (कार्याध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती) 

भाज्यांचे भाव एवढे पडले आहे, की उत्पादनखर्च निघत नाही. शेतातील माल बाजार समितीपर्यंत आणण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही. -प्रभाकर वायचळे (ग्रामविकास संवाद मंच)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

SCROLL FOR NEXT