Farmers demand to Stop compulsory loan recovery from District Bank to dada bhuse Nashik News  
नाशिक

जिल्हा बँकेकडून होणारी सक्तीची कर्जवसुली थांबवा; शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे कृषिमंत्र्यांना साकडे

अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धडक कर्ज वसुली मोहिम राबवत आहे. सदर वसुली तत्काळ थांबविण्याचे साकडे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले. 

शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव करणे, लिलाव पूर्व नोटीस, अपसेट प्राईस मंजुरी, इतर बँक खाते गोठवणे, शेतजमीन जप्त करणे यासारखे प्रकार सध्या जिल्हा बँकेकडून सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीतून जात आहे. कोरोनामुळे झालेले नुकसान, अवकाळी पाऊस, शेतमालाचे पडलेले भाव याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडून वसुली केल्यास आत्महत्या वाढू शकतात. या परिस्थितीचा विचार करता धडक वसुली मोहिम त्वरित थांबवण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन होळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, काँग्रेसचे संजय पाटील, खेडगावचे उपसरपंच प्रशांत पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT