Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg esakal
नाशिक

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला शेतकऱ्यांचा विरोध का? वाचा सविस्तर

अजित देसाई

सिन्नर : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात लोकार्पण होत आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वावी येथे समृद्धी महामार्गावर काळे झेंडे दाखवत लोकार्पण सोहळ्यास विरोध दर्शवला.

राज्य सरकारने समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण करून उद्घाटन करणे आवश्यक होते. समृद्धीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. शेतांमध्ये जायला रस्ते नाहीत, पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये शिरते, समृद्धी ठेकेदाराच्या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. यावर तोडगा काढणे अपेक्षित असताना राज्य सरकारकडून व रस्ते विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या अडचणी दुर्लक्षित करण्यात येत आहेत.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने सिन्नर तालुक्यातील वावी येथे पूर्व भागातील शेतकऱ्यांनी स्वराज्य पक्ष, छावा संघटना, शेतकरी संघटना आदी संघटनांच्या माध्यमातून एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या समृद्धी लोकार्पण सोहळ्यास विरोध दर्शवला. महामार्गावर येत शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. राज्य सरकार व रस्ते विकास महामंडळाच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT