mahavitaran 
नाशिक

विजेचे वेळापत्रक बदलल्याने बळीराजाची धावपळ; पीक वाचविण्यासाठी थंडीत काम करण्याची वेळ 

सोमनाथ चौधरी

दिक्षी (नाशिक) : १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शेती वीज भारनियमन वेळापत्रकात महावितरणकडून बदल केल्याने कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रब्बी पिकांसह नगदी पिके वाचविण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे.

निफाड तालुक्यातील दिक्षी फीडरवरील नवीन वेळापत्रकात रात्री आठ ते सकाळी सहा व सात ते दुपारी तीन या वेळेस थ्री फेज वीजपुरवठा केला जाणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे सिंचन करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असून, त्रासलेल्या शेतकऱ्यांनी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी दिक्षीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. 

दिवसा वीजपुरवठा मिळावा

सध्या रब्बी पिकांची पेरणी, कुठे कांदा, ऊस, गहू, हरभरे पिकांच्या सिंचनाचे काम सुरू झालेले आहे. यातच द्राक्ष हंगाम सुरू आहे. १ डिसेंबरपासून महावितरणकडून शेती वीज भारनियमन वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने वीज नसल्याने शेतकऱ्यांना रात्री जागरण करीत पिकांना पाणी द्यावे लागते आहे. सध्या थंडीचा जोर वाढत चालला आहे. रात्री वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर रोहित्रांवर अनेक तांत्रिक बिघाड होत असतात. ते दुरुस्तीसाठी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. त्यामुळे शेतकरी दिवसा वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी करीत आहेत. 

वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका 

तालुक्यात बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याने शेतीकामासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. यातच साप, विंचू यांच्यापासूनही त्यांना धोका असतानाही त्या अडचणींना सामोरे जावून काम करावे लागत आहे. 

दिवसभर शेतात राबल्यानंतर पुन्हा रात्री कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यायला जावे लागते. त्यामुळे नव्याने जाहीर झालेले वेळापत्रक रद्द करण्याची मागणी आमदार दिलीप बनकर यांच्याकडे केली आहे. 
-निवृत्ती धनवटे, संचालक- कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव 



आम्हा शेतकऱ्यांना दिवसभर शेतात राबूनही शेतकऱ्याला रात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. अनेकदा प्राण्यांचे हल्ले, सर्पदंश, विंचूदंश होत असतो. त्यामुळे वेळेत बदल व्हावा. 
-संगीता चौधरी, सरपंच दिक्षी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT