rain SYSTEM
नाशिक

निफाडला महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन; शेतकरी सुखावला

दिपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात खरीप हंगामातील ४० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना बुधवारी (ता. १८) मध्यरात्री हलक्या व रिमझिम पावसामुळे मोठे जीवदान मिळाले. शेतकऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर संततधार पाऊस सुरू असल्याने टोमॅटो, सोयाबीनसह पिके तरली आहेत. तरीही अद्याप मुसळधारेची प्रतीक्षा कायम आहे. २४ तासांत २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

श्रावण महिन्याला प्रारंभ होऊन आठवडा उलटला तरी तालुक्याचे शेतीशिवार ओलेचिंब झाले नव्हते. खरीप हंगामातील सोयाबीन, मका, टोमॅटो आदी पिके पाऊस नसल्याने संकटात सापडली होती. पिके कोमेजू लागल्याने पेरणी वाया जाते की काय, अशी धास्ती शेतकऱ्यांना होती. चिंतेचे ढग दाटलेले असताना बुधवारी पावसाचे कमबॅक झाले. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे, पण अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा पाऊस निफाड तालुक्यात ४५० मिलिमीटरची सरासरी गाठणार की नाही, याबाबत साशंकता होती. पावसाच्या पुनरागमनाने दिलासा मिळाला आहे.

छत्र्या, रेनकोट घेऊन नागरिक घराबाहेर...

नोकरी, बाजारात खरेदीसह विविध कामानिमित्त आज घराबाहेर पडताना नागरिक आज छत्री, रेनकोट घेऊन बाहरे पडले. दमदार नसला तरी सातत्याने रिमझिम पावसाने द्राक्षनगरी व परिसर ओलाचिंब झाला. शहराच्या उपनगरातील रस्ते चिखलमय झाले. काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झालेले दिसले. आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT