darna dam.jpg
darna dam.jpg 
नाशिक

इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वरमध्ये २४ तासांमध्ये अतिवृष्टी; धरणसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ

महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात वरुणराजा हजेरी लावत असून, शुक्रवारी (ता. १४) सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये अतिवृष्टी झाली. चोवीस तासांमध्ये धरणसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, दारणामधून नऊ हजार ९५६, भावलीतून ९४८, नांदूरमध्यमेश्‍वरमधून १६ हजार ८६५, हरणबारीमधून एक हजार ६४३, पुनंदमधून ८१८, माणिकपूंजमधून २५०, असा एकूण ३० हजारांहून अधिक क्यूसेक विसर्ग सुरू आहे. 

धरणसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ; ३० हजार क्यूसेक विसर्ग 
मध्यम आणि मोठ्या अशा २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी ऑगस्टच्या मध्याला ८७ टक्के जलसाठा होता. आज ५३ टक्के झाला असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ६७ टक्के जलसाठा झाला आहे. जायकवाडी धरणातील जलसाठा दिवसेंदिवस वाढत असल्याने यंदा जलसाठा ६५ टक्क्यांच्या पुढे पोचण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मराठवाड्याला नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी देण्याची आवश्‍यकता भासणार नाही. मात्र, जिल्ह्यातील धरणसाठा वाढवण्यासाठी गेल्या चोवीस तासांसारखा पाऊस किमान आठवडाभर होण्याची आवश्‍यकता आहे.

आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत नोंदवण्यात आलेला तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा (कंसात आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी) : नाशिक- ३९ (६७.२१), इगतपुरी- १२० (७५.५७), दिंडोरी- १८ (५४.३३), पेठ- ५३.२ (३९.१७), त्र्यंबकेश्‍वर- ११० (४०.४९), मालेगाव- ३२ (१३१.३३), नांदगाव- २२ (१०४.२१), चांदवड- २५.७ (६८.६७), कळवण- २८ (५७.२२), बागलाण- ३० (१२७.८२), सुरगाणा- ६२.२ (४०.३९), देवळा- ९८.७० (९१.९६), निफाड- १६.६ (७६.८५), सिन्नर- १८ (१११.९९), येवला- १४ (८९.७२). 

मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज 
इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान विभागातर्फे जिल्ह्यात शनिवार (ता. १५)पासून पाच दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी (ता. १५) ३९, रविवारी (ता. १६) ४३, सोमवारी (ता. १७) २९, मंगळवारी (ता. १८) ४१ आणि बुधवारी (ता. १९) ४३ मिलिमीटर पावसाचा अंदाज आहे.  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT