industry esakal
नाशिक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील १६ हजार उद्योग बंद

सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर (corona first and second wave) औद्योगिकसह इतर क्षेत्रांवरही गंभीर परिणाम झाला आहे. या काळात राज्यात जवळपास १६ हजार उद्योग (business) बंद झाल्याची आकडेवारी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जाहीर केली आहे. यात, नाशिक विभागातील सुमारे ३२५ पेक्षा जास्त लघुउद्योगांची चाके कमी-अधिक प्रमाणात मंदावली आहेत.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची आकडेवारी जाहीर

कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सर्वच व्यवसायांना बसला. यामुळे एप्रिल २०२० ते जून २०२१पर्यंतच्या काळात देशातील १६ हजार ५२७ कंपन्यांना आपले व्यवसाय करता आले नाहीत. त्यामुळे या कंपन्या त्यांच्या अनधिकृत नोंदीतून बाहेर गेल्या आहेत, तर केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२० पर्यंत नफ्यात असलेल्या उद्योगांची संख्या चार लाख ३७५ एवढी होती. याच वर्षात तोट्यातील कंपन्यांची संख्या चार लाख दोन हजार ४३१ एवढी होती.

उद्योग बंद पडल्याच्या नोंदी

नाशिक विभागात २५ वर्षांत विविध कारणांनी सहा हजार ९७६ उद्योग बंद पडल्याची नोंद जिल्हा उद्योग केंद्र, कामगार विभाग, एमआयडीसी, एमपीसीबी आदी विभागांकडे आहे. त्यात कोरोनामुळे सुमारे ३२५ पेक्षा जास्त लघुउद्योगांची भर पडल्याचे पाहायला मिळते.

राजकीय नेत्यांचे संबंध

यातील अनेक कंपन्या या बनावट, तसेच बेनामी व्यक्तीच्या नावाने होत्या. पण, या कंपन्यांचा अनधिकृतरीत्या ताबा विविध राजकीय नेत्यांशी संबंधित असून, त्या ‘ईडी’सह इतर तपास यंत्रणांद्वारे तपास उघड झाल्याचे समोर आले आहे. त्यात उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची संख्या अधिक असल्याचे सूत्रांकडून समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT