Sarang Ahire
Sarang Ahire esakal
नाशिक

Nashik News : जायखेड्यातील जवानाचा आसाममध्ये मृत्यू

मनोहर शेवाळे

जायखेडा (जि. नाशिक) : जायखेडा ता. बागलाण येथील रहिवाशी असलेले व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सारंग अशोक अहिरे (वय- ३२) यांचा आसाम येथे दुर्दैवी मृत्यू झाला. पण मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकले नाही. त्यांच्या मृत्यूची माहीती मिळताच संपुर्ण गाव व परिसर शोककळा पसरली. सारंगच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजाई, असा परिवार आहे. (Jaikheda indian army soldier dies in Assam Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सारंग यांनी अतिशय हालकीच्या परिस्थिती आपले शिक्षण पूर्ण केले. दहावी पर्यंतचे शिक्षण जायखेडा जनता इंग्लिश स्कुल मध्ये घेतले व नंतर बारावीचे शिक्षण ताहाराबाद येथे पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले आणि पुणे येथे सेवेला प्रारंभ झाला. सारंग हे भारतीय सैन्य दलात १०३ इंजिनिअरकडे गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत होते. रविवार (दि. २५) रोजी रात्री कुटुंबीयांना दूरध्वनीद्वारे ते कर्तव्यावर असतांना मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना त्यांच्या विभागाकडून कळविण्यात आले. सारंगच्या मृत्यूची बातमी सकाळी बागलाण तालुक्यात वनव्यासारखी पसरताच सर्वत्र शोककळा पसरली.

सारंग अहिरे याचे पार्थिव आज मंगळवार (दि. २७) रोजी दुपार पर्यंत जायखेडा येथे पोहचण्याचा अंदाज असून, त्यांना शासकीय इतमामात गावावरच अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT