bjp e sakal
नाशिक

भाजपच्या नव्या चार मंत्र्यांची १६ पासून 'जनआशीर्वाद' यात्रा

विक्रांत मते

नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नारायण राणे, डॉ. भागवत कराड व कपिल पाटील या चार मंत्र्यांची जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रा निघणार आहे. यासंदर्भात भाजप कार्यालयात नियोजनाची बैठक झाली. जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी माहिती दिली. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह सर्व विंगचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. पवार यांची यात्रा १६ ते २० ऑगस्टदरम्यान, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा १६ ते २१ ऑगस्ट या काळात तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची यात्रा १९ ते २५ ऑगस्ट या काळात निघणार आहे.

डॉ. भारती पवार यांच्या यात्रेत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटरचा समावेश आहे. १६ ऑगस्टला पालघर येथून सकाळी दहाला सुरवात होइल. मनोर, चारोटी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे त्र्यंबकेश्‍वर येथे रात्री आठला यात्रा पोचेल. १७ ऑगस्टला सकाळी नऊला शहरात दहावा मैल येथून सुरवात होईल. ओझर, पिंपळगाव, शिरवडे फाटा, वडाळीभोई, चांदवड, उमराणे, सौंदाणे, टेहेरे, मालेगाव चौफुली, सटाणा नाका येथे पोचेल. १८ ऑगस्टला सकाळी आठला मालेगाव येथून सुरवात होईल. नामपूर, ताहाराबद, पिंपळनेरमार्गे धुळे येथे यात्रेचे प्रयाण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT