yevala crop damage
yevala crop damage 
नाशिक

येवला तालुक्यात ३५ हजार शेतकऱ्यांची उभी पिके खराब; १६ हजार हेक्टरवर २० कोटींचे नुकसान 

संतोष विंचू

नाशिक/येवला : महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या परतीच्या तसेच अवकाळी पावसाने तालुक्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांची नासधूस केली आहे. यातील ३३ टक्‍क्‍यांवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

३३ टक्क्यांच्यावर नुकसानीचे पंचनामे पूर्ण

अहवालानुसार सुमारे २० कोटी १२ लाखांचे नुकसान तालुक्यातील शेतकऱ्यांना सहन करावे लागले. यंदा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असले तरी शासनाच्या निकषानुसार ३३ टक्क्यांच्यावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये बाजरीचे २.१० तर मक्याचे सर्वाधिक दोन हजार ३२८ हेक्टरवर, कापसाचे एक हजार ४९११ हेक्टर, भुईमुगाचे ३.७ हेक्‍टर, तर सोयाबीनचे ११२ हेक्‍टरवर असे जिरायती पिकांखालील तीन हजार ९३६ हेक्टरवर नुकसान झाले असून, याचा फटका आठ हजार ३६० शेतकऱ्यांना तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांना बसला आहे. 

शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष

तालुक्यात कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, पंचनाम्यांनुसार २६ हजार ६४४ शेतकऱ्यांचे तब्बल १२ हजार ९४१ हेक्‍टरवर कांद्याचे व दोन हेक्टर भाजीपाल्याचे नुकसान होऊन १७ कोटी ४३ लाखांना फटका बसला आहे, तर फळपिकामध्ये ॲपल बोरचे २.४०, तर द्राक्षाचे १.८० असे ४.२० हेक्‍टरवरील चार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या अहवालात बागायती कांदा व भाजीपाल्यासाठी हेक्‍टरी १३ हजार ५००, फळपिकांसाठी १८ हजार, तर जिरायती पिकासाठी सहा हजार ८०० रुपये दराने मदतीचा उल्लेख असून, आता शासनाकडून काय मदत मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

अहवाल वरिष्ठांना पाठविला असून, शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली आहे. शासनस्तरावरून मंजूर होणाऱ्या निकषाने नुकसानभरपाईचा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल. 
-प्रमोद हिले, तहसीलदार, येवला 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT