ayodhya sharyu.jpg 
नाशिक

आठवणीतील अयोध्या : जेव्हा शिवसैनिकांच्या चैतन्याने भारावला होता ‘शरयू’चा काठ.. नाशिकमधील शिवसैनिकांची कार्यक्रमात छाप

विक्रांत मते

नाशिक : अयोध्येत श्रीराम मंदिर झालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या रथयात्रेला त्या वेळी शिवसैनिकांची कुमक मिळाली. एकीकडे आठ दिवस अगोदर नियोजन करताना नाशिकमधून अधिकाधिक शिवसैनिकांना अयोध्येत नेण्यासाठीच्या नियोजनाची जबाबदारीदेखील टाकली होती. पहिल्या वर्षी स्पेशल रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. त्यात एक हजार ६०० शिवसैनिक सहभागी झाले होते, तर दुसऱ्या वर्षी बसचे नियोजन करताना शरयू महाआरतीच्या कार्यक्रमात नाशिकमधील शिवसैनिकांची छाप दिसून आली. 

महाआरतीवर नाशिकची छाप 

बाबरी मशिद ढासळल्यानंतर माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, असे सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने दोन वर्षांपासून अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी महाआरती करून श्रीराम मंदिराच्या मुद्याला कायम हवा दिली आहे. दोन वर्षांपासून शिवसेनेकडून शरयू नदीच्या किनारी रामलल्लाची आरती केली जाते. शिवसेनेची ही महाआरती संपूर्ण देशात कायम चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे नाशिक शिवसेनेकडेच महाआरतीचे नियोजन करण्याची जबाबदारी असल्याने अयोध्येत श्रीराम मंदिराची मुहूर्तमेढ रोवली जात असताना नाशिकच्या शिवसैनिकांना त्याचा अभिमान वाटत आहे. 

नियोजनासाठी नाशिकची टीम 
प्रभू श्रीरामचंद्राचे नाशिकच्या पंचवटीत वास्तव्य असल्याने नाशिकला पौराणिक काळापासून महत्त्व आहे. आजही त्याचा संदर्भ नाशिकमधील प्रत्येकाच्या जीवनाशी आहे. म्हणूनच शिवसेनेतर्फे अयोध्येत महाआरतीचा कार्यक्रम करताना नाशिकमधील शिवसैनिकांकडेच जबाबदारी सोपविली जाते. फेब्रुवारी २०१८ मध्ये शिवसेनेने अयोध्येत महाआरतीचा कार्यक्रम घोषित केला. त्यावेळी नियोजनासाठी टीम तयार करण्यात आली. शिवसेनेचे नाशिकचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे व माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर यांचा त्यात समावेश हहोता. नदीची आरती, आरतीची पंचागानुसार वेळ, शासकीय परवानग्या, व्हीआयपी नेत्यांच्या वास्तव्याचे नियोजन, साधू-महंतांना निमंत्रणे, पुजारी आदीबाबतचे नियोजन महाआरतीच्या आठ दिवस आधी करण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मिळालेले समाधान आयुष्यभर विसरता येणार नसल्याचे श्री. बोरस्ते यांनी सांगितले. पहिल्या वर्षाचे यशस्वी नियोजन झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे मार्च २०१९ मध्ये पुन्हा याचप्रमाणे नियोजनाची जबाबदारी नाशिकच्या टीमवर सोपविण्यात आली होती. 

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT