Adivasi Morcha esakal
नाशिक

Nashik Adivasi Morcha : भात खाऊन दिवस काढला पण शौच अडचण; आंदोलकांच्या व्यथा

Adivasi Morcha : आपल्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी गावापासून नाशिक शहरापर्यंत पायी चालत आलेल्या ‘माकप’च्या आंदोलकांनी सोमवारी (ता.२७) रात्री ‘स्मार्ट सिटी’च्या रस्त्यावरच मुक्काम केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Adivasi Morcha : आपल्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी गावापासून नाशिक शहरापर्यंत पायी चालत आलेल्या ‘माकप’च्या आंदोलकांनी सोमवारी (ता.२७) रात्री ‘स्मार्ट सिटी’च्या रस्त्यावरच मुक्काम केला. सीबीएस ते अशोक स्तंभापर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला चुली पेटल्या. त्यावर भात, वरण, खिचडी शिजली आणि रस्त्यावरच पंगतीही उठल्या. (Nashik Adivasi Morcha marathi news)

मात्र सकाळी उठल्यावर शौचास कुठे जायचे, असा जटिल प्रश्न निर्माण होऊन विशेषत: महिलांची यामुळे कुचंबणा झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील सार्वजनिक शौचालयाचा बहुतेकांनी वापर केला. पण आंदोलकांची संख्या जास्त असल्यामुळे सर्वांना या सुविधेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे नदीकाठच्या परिसराचा आसरा घेतल्याची कबुली या आंदोलकांनी दिली.

दोन-तीन दिवसांपासून पायी निघालेले ‘लाल वादळ’ सोमवारी (ता.२६) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले. तेव्हापासून रस्त्यावर ठिय्या मांडलेल्या आंदोलकांनी झोपण्यासाठी अंथरूण, पांघरूण सोबत आणले आहे. त्याचा वापर करून ‘स्मार्ट सिटी’ रस्त्यावरच रात्री काढली. सकाळी उठल्यापासून प्रात:विधी, अंघोळ व स्वयंपाकासाठी पाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली.

पाण्यासाठी टँकर पुरवल्याने पाणी टंचाई जाणवली नाही. पण शौचालयांची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे आंदोलकांची कुचंबणा झाल्याचे चित्र दिवसभर दिसून आले. थोडासा विरंगुळा म्हणून काही ठिकाणी पत्तेही खेळताना लोक दिसले. तर ठिकठिकाणी गप्पांचे फड रंगले होते. शिष्टमंडळ मुंबईत चर्चेसाठी गेल्यामुळे दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडला. त्यामुळे सीबीएस ते अशोक स्तंभ हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच होता. (latest marathi news)

प्रत्येकाच्या हाती सातबारा

आंदोलक यापूर्वी शासनाकडून मिळालेला सातबारा सोबत घेऊनच आले आहेत. कुणाकडे चार एकर जमीन असताना सातबारा उताऱ्यावर फक्त अर्धा, एक एकर जमिनीची नोंद दिसते. किमान शेतकरी कसतो तेवढी तरी जमीन त्याच्या नावावर झाली पाहिजे, अशी माफक अपेक्षा या आंदोलकांनी व्यक्त केली.

''दिवसभर बसून राहिल्यामुळे जास्त वेळा भूक लागते. त्यामुळे जास्त खाल्ले जाते. शिवाय शहरात पाववडा, वडापाव, समोसा सहज उपलब्ध असल्यामुळे जास्त जेवण होते. आम्हाला जेवण, पाण्याची योग्य व्यवस्था आहे. फक्त शौचालयाची अडचण आहे.''-मधुकर गायकवाड, वणी (ता.दिंडोरी)

''आमचा सातबारा उतारा बघितला तर अर्धा किंवा एकच एकर जमीन नावावर दिसते. पण आमच्याकडे जास्त जमीन असताना सरकार आम्हाला जमीन का देत नाही, हेच कळत नाही.''- दिलीप गायकवाड, वणी (ता.दिंडोरी)

''आम्हाला शहरातील जीवन आवडत नाही. पण नाइलाजाने यावे लागते. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी आम्ही हक्कांपासून वंचित राहिल्यामुळे ही वेळ येते.''- जगदेव गायकवाड, दिंडोरी

''जेवण व पाण्याची व्यवस्था चांगली आहे. आमच्या गरजाही कमी असल्यामुळे आम्ही त्याविषयी तक्रार करत नाही. शौचालयाची व्यवस्था झाली तर महिलांसाठी अधिक सोईचे होईल.''- सुरेश गायकवाड, सुरगाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT