A guide book prepared for Sunday examination of new literates.  esakal
नाशिक

Central Government ULLAS: केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात नवसाक्षरांची रविवारी लेखी परीक्षा!

Nashik News : या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळास्तरीय समित्यांची स्थापना केली आहे.

विजय पगारे

इगतपुरी : देशात पाच कोटींहून अधिक लोक निरक्षर असून, त्यांना साक्षर करण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी येत्या रविवारी (ता. १७ ) होणार आहे.

राज्यात आतापर्यंत सहा लाख २० हजार असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्र शासनाकडे झाली असून, त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. दरम्यान पाच लाखांहून अधिक नवसाक्षर ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षांसह इतरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत.त्यामुळे नातवंडांसह आता आजी-आजोबाही अभ्यासात सध्या मग्न आहेत. (Nashik Central government sponsored Ullas Nav Bharat Literacy program marathi news)

राज्य सरकारने १४ ऑक्टोबर २०२२ला ही योजना स्वीकारली आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळास्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. उल्लास ॲपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा आहे. नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी ऑफलाईन पद्धतीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे, ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. नोंदणीकृत असाक्षरांनी रविवारी त्या शाळेत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

अशी होईल परीक्षा

प्रश्नपत्रिका पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाशी संबंधित पुढील तीन भागांत विभागली असून, एकूण १५० गुणांची आहे. अनुक्रमे भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग,(संख्याज्ञान) ५० गुण आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. (latest marathi news)

कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण मिळू शकतील. तीनही भागांचे मिळून पाचपेक्षा जास्त ग्रेस गुण मिळणार नाहीत. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी तीन तासांचा असेल. (दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ) परीक्षार्थी परीक्षेसाठी वरील कालावधीत कधीही येऊ शकेल.

ही परीक्षा विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक देण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यामातून व्यक्तीमध्ये विविध जीवनकौशल्ये विकसित होतील, तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

जिल्हानिहाय निरक्षरांची संख्या

जिल्हा : निरक्षर संख्या

नाशिक : ८ लाख ६० हजार २५८

जळगाव : ७ लाख ३४ हजार ३३५

नगर : ७ लाख ८४ हजार ३२४

पालघर : ६ लाख ८१ हजार ५७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT