Congress District President Shirish Kotwal during a discussion with Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan in the Parliament premises on Tuesday esakal
नाशिक

Nashik Onion News : कांद्यावरील निर्यात उठवावी, कांद्याला हमी भाव द्यावा; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोतवाल यांची मागणी

Nashik News : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची आग्रही मागणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कांदा निर्यातबंदीवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची लोकसभा निवडणुकीत चांगलीच कोंडी झाली. यातच ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या कांदा खरेदी-विक्री केंद्रावर भेटी दिल्या असता यात गैरप्रकार आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. (Congress District President Shirish Kotwal met Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan)

यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची आग्रही मागणी केली. या वेळी कोतवाल यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, त्यांचे प्रश्न समजावून घ्यावेत, अशी मागणी केली. त्यासाठी आपण नाशिक जिल्ह्यात यावे, शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे कोतवाल यांनी सांगितले.

त्यावर, केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी आमच्या सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष आहे, मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नाशिकला येणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीचे खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, डॉ. शोभा बच्छाव यांचा लोकसभा सदस्य शपथविधी मंगळवारी (ता. २५) संसदेत झाला.

त्यासाठी काँग्रेस पदाधिकारी दिल्लीत गेले आहेत. यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोतवाल, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, नंदू कोतवाल, प्रसाद देशमुख या शिष्टमंडळाने संसद परिसरात केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांची भेट घेतली. या भेटीत कोतवाल यांनी महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. कांद्यावर निर्यात शुल्क आकारले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. (latest marathi news)

त्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कांद्याला हमी भाव देण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. गत चार महिन्यांत कांदा प्रश्नावर केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणांचा मोठा परिणाम झाला असून, त्याचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

याशिवाय ‘नाफेड’कडून होत असलेल्या कांदा खरेदीतील गैरप्रकारही कोतवाल यांनी या वेळी निदर्शनास आणून दिला. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घ्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर, केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी सरकार याबाबत चर्चा करेल, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT