Anil Deshmukh esakal
नाशिक

Nashik News : चांदीवाल अहवाल सरकारने पटलावर मांडावा : माजी गृहमंत्री देशमुख

Nashik : आपल्यावर शंभर कोटींचा खोटा आरोप करण्यात येऊन तुरुंगात टाकले. याप्रकरणी न्या. चांदीवाल आयोगाने चौकशी करून अहवाल सरकारला सादर केला. परंतु अद्यापही सरकार तो अहवाल पटलावर मांडत नाही.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आपल्यावर शंभर कोटींचा खोटा आरोप करण्यात येऊन तुरुंगात टाकले. याप्रकरणी न्या. चांदीवाल आयोगाने चौकशी करून अहवाल सरकारला सादर केला. परंतु अद्यापही सरकार तो अहवाल पटलावर मांडत नाही. या अहवालातून धक्कादायक खुलासे बाहेर येतील असा दावा करीत, त्यावेळी विदर्भातील एका अॅफिडेव्हिट करण्यास सांगितले, ते केले असते तर ईडी-सीबीएस मागे लागली नसती असा धक्कादायक खुलासाही माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. (Nashik Former Home Minister Deshmukh marathi news)

नाशिक येथे खासगी कामानिमित्ताने आले असता, माजी गृहमंत्री देशमुख यांनी पत्रकारांची संवाद साधला. देशमुख म्हणाले, तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आपल्या १०० कोटी रुपयांचा आरोप केला होता. तसेच, अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओत बॉम्ब ठेवला, चालकाचा खून झाला, या सार्याचा मास्टरमाईंड पोलीस आयुक्त परमवीर सिंग होते.

त्यात सचिन वाजेही सहभागी होता. याप्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये न्या. चांदीवाल यांची चौकशी करून सरकारला अहवाल सादर केला आहे. परंतु अद्यापही विद्यमान सरकार तो अहवाल विधानभवनाच्या पटलावर आणत नाही. या चौकशी समितीला परमवीर सिंग समन्य बजावूनही हजर राहिले नाहीत. (latest marathi news)

दुसरीकडे ईडीने न्यायालयात अवघ्या एक कोटी ७४ लाखांप्रकरणी खोटे दोषारोपपत्र सादर केले. मग १०० कोटींचा आरोप खोटाच होता. तरीही १४ महिने तुरुंगात काढावे लागले. सदरचा अहवाल सरकारने मांडला नाही तर, आपण न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचेही श्री. देशमुख म्हणाले. यावेळी माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

योग्यवेळी नाव सांगणार

आपल्यावर आरोप झाले त्यावेळी विदर्भातील भाजपाच्या एका नेत्याने आपणास अॅफिडेव्हिट करण्यास सांगितले होते. त्यात गंभीर आरोप सरकार होते. तसेच, पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणणारे मुद्दे होते. ते केले असते तर ना ईडी ना सीबीआय काहीच मागे लागले नसते. मात्र तेव्हाच आघाडीचे सरकार पडले होते. त्या नेत्याचे नाव आपण योग्य वेळ आली की उजेडात आणू असेही श्री. देशमुख म्हणाले.

राजकीय फायद्यासाठी यंत्रणांचा वापर

राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात भाजपाकडून यंत्रणेचा गैरवापर राजकीय फायद्यासाठी केला जातो आहे. योग्य वेळ आली की आपण मीडियासमोर माहिती सादर करणार असल्याचे सांगत, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सरकार अस्तित्वात येईल. प्रत्यक्ष निवडणुका सुरू झाल्यावर महाविकास आघाडीचा झंझावात राज्यात दिसेल. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष फोडून पक्षचिन्ह चोरले जात आहेत हे जनतेला पटलेले नाही. ते येत्या निवडणुकांमधून स्पष्ट दिसेल असेही श्री. देशमुख म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT