SAKAL Exclusive esakal
नाशिक

SAKAL Exclusive : विविध कृषी पुरस्कारात शासनाकडून भरघोस वाढ! राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून पुरस्कारांचे दरवर्षी वितरण

Nashik News : शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारात लाखोंची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारात लाखोंची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Government) घेतला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराच्या रक्कम ७५ हजारांहून तीन लाख रुपये करण्यात आली आहे.

याशिवाय वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषी भूषण, वसंतराव नाईक शेती मित्र यासह अन्य पुरस्कारांच्या रकमेतही दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाने याबाबतचा शासन आदेश काढले आहेत. (nashik agricultural award maharashtra government marathi news)

कृषी विभागाकडून महत्त्वाचा दिला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराचे सध्याचे स्वरूप सन्मानचिन्ह व ७५ हजार रुपये रोख होते. यामध्ये वाढ करून पुरस्काराची रक्कम ३ लाख रुपये केली आहे. या पुरस्कारासाठी केवळ एकाच शेतकऱ्याची निवड केली जाते.

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराची सध्याची रक्कम ५० हजार रुपये आहे. यामध्ये २ लाखांपर्यंत भरीव वाढ केली आहे. या पुरस्कारांची संख्या ८ इतकी आहे. जिजामाता कृषी भूषण पुरस्काराची रक्कम ५० हजारांवरून २ लाखांपर्यंत वाढविली आहे. या पुरस्कारांची संख्या ५ इतकी आहे.

कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्काराची रक्कमही ५० हजारांवरून २ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या पुरस्कारांची संख्या ८ इतकी आहे. वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्काराची रक्कम ३० हजार इतकी आहे. ती आता एक लाख २० हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या पुरस्काराची संख्या ३ इतकी आहे. (Latest Marathi News)

युवा शेतकरी पुरस्काराची रक्कमही ३० हजाराहून १ लाख २० हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या पुरस्कारांची संख्या ८ आहे. उद्यानपंडित पुरस्कारासाठी रक्कम ५० हजाराहून २ लाख करण्यात आली आहे. या पुरस्कारांची संख्या ८ इतकी आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गटासाठी ११ हजार इतकी पुरस्काराची रक्कम होती.

ती आता ४४ हजार इतकी केली आहे. या पुरस्कारांची संख्या ३४ इतकी आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट या पुरस्काराची रक्कमही ११ हजारांवरून ४४ हजार केली आहे. या पुरस्कारांची संख्या ६ इतकी आहे. पुरस्कारार्थींना पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता द्यावयाच्या दैनिक व प्रवास भत्त्याच्या रकमेत वाढ केली असून, दैनिक व प्रवास भत्त्याची रक्कम प्रति पुरस्कारार्थी १५ हजार इतकी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT