Onion Auction esakal
नाशिक

Nashik Onion Auction: महिन्यात 3 लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प! निर्यातीसोबत कांदा लिलाव बंद ठरले दुष्काळात तेरावा महिना

Nashik News : एकट्या पिंपळगाव बाजार समितीत महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प होऊन त्यातून ५० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू शकले नाही.

एस.डी.आहिरे

पिंपळगाव बसवंत : एकट्या पिंपळगाव बाजार समितीत महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प होऊन त्यातून ५० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू शकले नाही. शेतकऱ्यांसाठी निर्यातीबरोबरच महिन्याभरापासून बंद राहिलेले कांदा लिलाव दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे. (Nashik Onion Auction stopped)

बऱ्याचदा संकट हे गट्टी करून येतात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे सातत्याने घडत असते. गेली चार महिन्यापासून याची प्रचिती पुन्हा पुन्हा आली. केंद्र शासनाने कांद्याला निर्यातीच्या जोखडात बांधून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या घामाच्या दामावर वरंवटा फिरविला. बाजारभाव निम्यावर आले. हे संकट कमी म्हणून की काय गत महिन्यापासून व्यापारी व मापारी यांच्यात सुरू असलेल्या लेव्हीच्या संघर्षावरून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प राहीले.

गेली दोन महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या हंगामाचा श्रीगणेशा झाला.अगोदर निर्यातबंदीची दृष्ट लागलेली असल्याने सरासरी दीड हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकण्याची वेळ आली.उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना किमान अडीच हजार रूपया भाव मिळायला हवा होता.

पण निर्यातबंदीने सगळ मुसळ केरात गेले.केंद्र शासनाने नाफेडद्वारे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदीचा उतारा काढला.पण जखम मांडीला अन मलम शेंडीला..असा उपाय कुचकामी ठरला. निर्यातबंदीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसत असताना व्यापारी व माथाडी कामगारांमधील लेव्हीचा वाद गेली महिन्याभरापासून शेतकऱ्यांच्या मुळावर उठला. (Latest Marathi News)

महिन्यात ५० कोटीची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे आवक होत असते. महिन्याभरापासून पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प आहे.त्यामुळे सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची विक्री पिंपळगाव बाजार समितीत होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे सुमारे ५० कोटी मिळाले नाही.

बँकांच्या पीक कर्ज परतफेडखरीप हंगामाची तयारी,घरातील मुला-मुलीचे लग्नाचा कांदा लिलाव ठप्प असल्याने खोळंबा झाला.विक्री व्यवस्था नसल्याने कांदा बांधावर,चाळीत पडून राहिला व त्याचा दर्जा ही घसरला. बाजार समितीचे सुमारे ५० लाखांचे उत्पन्न बुडाले.

"अगोदरच निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या चांगल्या कांद्याला मिळणाऱ्या आकर्षक दरापासून मुकावे लागले.व्यापारी व कामगारांचे लेव्ही चे वाद शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले. बंदचा फटका शेतकऱ्यांसोबतच बाजार समित्यांनाही आर्थिक झळ बसली."

-आमदार दिलीप बनकर (सभापती,बाजार समिती,पिंपळगाव बसवंत).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT