Pomegranate esakal
नाशिक

Nashik Pomegranate Rates Fall: डाळिंबाची लाली पडली फिकी! इतर फळांची आवक झाल्याने दरावर परिणाम

Nashik News : रमजान पर्वामुळे बाजारात टरबूज, खरबूज, केळी, चिकू, सफरचंद आदी फळांची मोठ्या प्रमाणावर आवक आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : डाळिंबाच्या हस्त बहारातील अखेरच्या टप्प्यातील फळे सध्या बाजारात येत आहेत. उन्हामुळे डाळींबाचे दाणे काहीसे पांढरे होत आहेत. शिवाय रमजान पर्वामुळे बाजारात टरबूज, खरबूज, केळी, चिकू, सफरचंद आदी फळांची मोठ्या प्रमाणावर आवक आहे.

१५ दिवसाच्या तुलनेने डाळिंबाचे भाव काहीसे घसरले आहेत. अखेरच्या टप्प्यातील माल सर्वसाधारण व दुय्यम प्रतीचा असल्याने भावात घसरण झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कसमादेतील शेतकऱ्यांनी आगामी आंबे बहार मोठ्या प्रमाणावर धरला आहे. (Nashik Pomegranate Price fall marathi news)

कसमादेत डाळिंबाचे आगार आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्यानंतर सर्वाधिक डाळिंब कसमादेत आहे. मध्यंतरीच्या काळात मर व तेल्या रोग नियंत्रणात आल्यानंतर डाळिंबाचे क्षेत्र वाढले. सध्याच्या परिस्थितीत डाळिंब हे एकमेव पीक शेतकऱ्यांना पैसे मिळवून देत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी सातमाने येथील युवा शेतकरी निलेश जाधव यांचा डाळींब बांगलादेशला निर्यात झाला. त्यांच्या डाळिंबाला राज्यात सर्वोच्च १३५ रुपये किलोचा भाव मिळाला. हस्त बहार अंतिम टप्प्यात आलेला आहे. कसमादेत उन्हाचा तडाखा वाढला आहे. ऊन पडू लागल्याने डाळींबाच्या आतील दाणे काही प्रमाणात पांढरे पडतात. तसेच अंतिम टप्प्यातील माल असल्याने मालाची प्रतवारी कमी आहे.

त्यातच टरबूज, खरबूज, केळी, चिकू, सफरचंद यांची आवक वाढली आहे. मोठ्या बाजारपेठांमध्ये आंबे विक्रीला येत आहेत. होळीचा सण असल्याने उत्तर भारतात अनेक प्रतिष्ठाने आठवडाभर बंद असतात. सणामुळे मजुरही सुटीवर असतो. या कारणांमुळे देखील देशांतर्गत बाजारपेठांमध्ये डाळिंबाची मागणी कमी-अधिक होत आहे.  (latest marathi news)

हस्त बहाराच्या अंतिम टप्प्यातील माल व इतर फळांची आवक वाढल्याने बाजारातील डाळिंबाची लाली काहीसी फिकी पडली आहे. घाऊक बाजारात सर्वसाधारण डाळिंब ६० ते ७५ रुपये तर उच्च प्रतिचा डाळिंब ९० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे.

किरकोळ बाजारात मात्र डाळिंबाला शंभर ते दीडशे रुपये दरम्यान भाव आहे. तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी आंबे बहार धरला आहे. आंबे बहाराचे उत्पन्न जुलै-ऑगस्टमध्ये येईल. दुष्काळी परिस्थितीत आगामी तीन महिने जिकरीचे राहतील.

"डाळिंबाचे क्षेत्र वाढण्यासाठी शासनाने शंभर टक्के अनुदानावर फळबाग योजना राबवावी. मर व तेल्या रोगामुळे फवारण्यांचा खर्च वाढला आहे. एकूण उत्पादन खर्चातही वाढ होत आहे. दुष्काळाशी दोन हात करत शेतकरी डाळिंब बागा वाचवित आहेत. कसमादेचा डाळिंब निर्यातक्षम असतो. निर्यात शुल्क कमी केल्यास डाळिंबाला आणखी चांगले भाव मिळतील."

- अरुण देवरे, शेतकरी, दाभाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT