Written Test esakal
नाशिक

Nashik Police Written Test: पोलिस भरतीच्या ‘लेखी’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात! शहराची KTHM तर, ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

Police Recruitment : मुंबई वगळता राज्यभरात व शहर - ग्रामीण पोलीसांकडून लेखी परीक्षेसाठी जय्यत तयारी सुरू असून, नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Written Test : लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेली पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पडली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना लेखी परीक्षेची ओढ लागली असून ही परीक्षा येत्या रविवारी (ता. ७) होते आहे. मुंबई वगळता राज्यभरात व शहर - ग्रामीण पोलीसांकडून लेखी परीक्षेसाठी जय्यत तयारी सुरू असून, नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. (Nashik Preparation for Police Recruitment Written Test in Final Phase)

नाशिक शहर आयुक्तालयातील शिपाईपदाच्या ११८ रिक्त जागांसाठी सुमारे ७ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील ४ हजार ३७४ उमेदवारांची मैदानी चाचणी दिली होती. दोन तृतीयपंथी उमेदवारांसह शेकडो उमेदवार ५० पैकी २५ गुणही न मिळवू शकले.

त्यामुळे असे उमेदवार नापास झाले आहेत. तर, उर्वरित उमेदवारांची प्रवर्गनिहाय लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयातर्फे घेण्यात येणारी लेखी परीक्षा गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयात घेतली जाणार आहे.

तसेच, नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त ३२ जागांसाठी सुमारे तीन हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. यात २ हजार ६०२ पुरुष, ५७६ महिला, ४२ माजी सैनिक व इतर पाच उमेदवारांच्या अर्जांचा समावेश होता. यातील ३ हजार १६० उमेदवारांनी मैदानी चाचणीला पाचारण केले असता, १ हजार ८१८ उमेदवारांनी हजेरी लावली. छाती, उंची व अन्य निकषांअंती २५३ उमेदवार अपात्र ठरले. तर, एका उमेदवाराने माघार घेतली होती. (latest marathi news)

ग्रामीण पोलीस दलातर्फे रविवारी (ता. ७) होणारी लेखी परीक्षा आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी ३१६ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, खुल्या प्रवर्गाचा ‘कटऑफ’ ४३ गुणांचा आहे, तर ६८० उमेदवारांना २५ पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत.

दीड तासांचा अवधी

पोलीस भरतीकरीता येत्या रविवारी (ता. ७) लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून उमेदवारांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांना सकाळी ७ वाजता परीक्षा केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहावयाचे आहे. १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी दीड तासाचा (९० मिनिटे) अवधी दिला जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडींवर ही परीक्षा आधारित असून, किमान ४० टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Fifa World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला, Mumbai Indians कडूनही जोरदार सेलिब्रेशन; दोघांचं नेमकं काय कनेक्शन?

RTI Andolan: अण्णा हजारे आक्रमक! आरटीआय कायद्याविरोधात पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा; राळेगणसिद्धीत चर्चा निष्फळ

रोमान्स, हॉरर आणि भावनांचा संगम; सई मांजरेकरच्या 'इकाई'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT