Nashik Unseasonal Rain Damage sakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: नाशिक पूर्व भागात पिकांचे पंचनामे अपूर्णच! शासकीय यंत्रणा उदासीन; शेतकऱ्यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक पूर्व भागात नुकसानग्रस्त भागाची पाहणी झाली नसून अनेक ठिकाणचे शेतकरी नुकसान भरपाईच्या सर्वेपासून वंचित आहे. शासकीय यंत्रणा उदासीन असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची शाश्वत हानी झालेली आहे, ती कधीही न भरून निघणारी असल्यामुळे शासकीय यंत्रणा अजून शेताच्या बांधावर पोचलेली नाही. नेत्यांनी विशिष्ट ठराविक भाग कॅप्चर केल्याचे शेतकऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. (Nashik Unseasonal Rain Damage Panchnama of crops in Nashik East incomplete government system indifferent Allegation of farmers)

नाशिक रोडचा पूर्व भाग शिंदे, पळसे, नाणेगाव, जाखोरी, लाखलगाव, दोनवाडे, ओढा, चांदोरी, शिलापूर या भागातील शेतकऱ्यांचे व द्राक्ष पिकांच्या अतोनात नुकसान झाले.

निफाड तालुक्यासह देवळाली मतदारसंघात येणाऱ्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून शासकीय यंत्रणा बांधावर अजून पोचलेली नसल्याचे धक्कादायक वास्तव शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते केवळ पाहणी आणि फोटोसेशन पुरतेच विशिष्ट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबरच गरीब शेतकऱ्यांच्या बांधावर शासकीय यंत्रणा अजून पोचलेली नाही.

शिंदे, पळसे, जाखोरी व इतर भागात एका कंपनीने मुळ्याचे कनिष्ठ प्रकारचे बियाणे दिल्यामुळे सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

यासंदर्भात नाशिक शेतकरी सल्लागार समिती अशा शेतकऱ्यांची यादी करत असून बोगस बियाणे दिलेल्या कंपन्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे करणार आहे. तेथून न्याय मिळाला नाही तर थेट कोर्टात या कंपनीविरोधात खटला दाखल करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

"आम्ही बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करणार असून, बोगस विक्री करणाऱ्या कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांना साकडे घालणार आहोत. तेथून न्याय न मिळाल्यास थेट कोर्टात न्याय मागणार आहोत. शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करून घेतला जाणार नाही."

- विष्णुपंत गायखे, सदस्य, जिल्हा शेतकरी सल्लागार समिती

"शासकीय यंत्रणा आजपर्यंत बांधावर आलेली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांना त्वरित जलदगतीने नुकसान भरपाई मिळायला हवी. शासकीय यंत्रणा उदासीन दिसते आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळायला हवा."

- नामदेव कांडेकर, माजी सरपंच, लाखलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT