Vegetable Rate Hike esakal
नाशिक

Nashik Vegetable Rate Hike : पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले; टोमॅटो, भेंडी 80 रु. किलो

Vegetable Rate Hike : जून संपण्यावर आला तरी पावसाचे आगमन होत नसल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Vegetable Rate Hike : जून संपण्यावर आला तरी पावसाचे आगमन होत नसल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. पाण्याअभावी अर्धवट वाढ झालेल्या टोमॅटोला ८० रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. तर अव्वल दर्जाचा टोमॅटोची किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. शाळा सुरु झाल्यापासून भेंडीच्या मागणीत वाढ झाल्याने २० रुपये पावशेरने विक्री होते. याशिवाय पालेभाज्यांमध्ये मेथी व कोथंबीर ५० रुपयांना जुडी मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला घेणे काहीअंशी आवक्याच्या बाहेर जात आहे. ( Vegetable Rate Hike due to delay in monsoon )

जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. परंतु, यंदा जून संपण्याला एकच आठवडा शिल्लक असताना अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी, भाजीपाल्याची आवक घटली आहे. विशेषत: टोमॅटो, मेथीची भाजी, वांगी, मिरची, दुधी भोपळा, कोथंबीर यांच्या किमतीत अचानकपणे वाढ झालेली दिसून येते. टोमॅटो, वांगी, मिरची, कारले व भेंडी ८० रुपये किलोप्रमाणे मिळत आहे.

तर पालेभाज्यांमध्ये मेथी व कोथंबीर सर्वात महाग आहे. ५० रुपयांना एक जुडी मिळते. या तुलनेत पालक आणि तांदुळक्याची भाजी स्वस्त असून, १० ते २० रुपयांना जुडी मिळते. वर्षभर भाव खाणारी मिर्ची यंदाही ‘तिखट’च आहे. २० ते ३० रुपये पावशेर याप्रमाणे मिरचीची विक्री होत आहे. शिमला मिरची ६० रुपये किलो पर्यंत मिळते. दोडके, गिलके ३० रुपये पावशेरने मिळत आहेत.

उन्हाळ्यात ‘चिप्स’मुळे भाव खालेले बटाटे आता जागेवर आले आहेत. ६० रुपये किलोपर्यंत बटाटे मिळत आहेत. एकंदरित, पालेभाज्यांपेक्षा फळभाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढलेले दिसून येतात. जुलैमध्ये चांगला पाऊस पडला तर पालेभाज्यांचे दर अजून कमी होऊ शकतात. टोमॅटो व भेंडीचे दर अजून काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.

उसळच्या मागणीत वाढ

फळभाज्या व पालेभाजांची किंमत वाढल्याने मठाच्या उसळच्या मागणी वाढली आहे. २० रुपये पावशेर या दराने ही उसळ मिळत असल्याने अर्धा किलोमध्ये दोन वेळा भाजी करण्याला गृहिणी पसंती देतात. कांद्याचे दरही आता वाढले असून किरकोळ बाजारात ४० रुपये किलोने उन्हाळ कांदा मिळत आहे.

भाजीपाल्याचे दर (प्रती किलो)

टोमॅटो ७० ते ८० रु.

कांदा ३५ ते ४० रु.

बटाटा ५० ते ६० रु.

भेंडी ७० ते ८० रु.

गिलके-दोडके ७० ते ९० रु.

शेवगा शेंग ८० ते ९० रु.

कोथिंबीर ५० रु. (जुडी)

मेथी ५० रु. (जुडी)

गड्डा कोबी ४० रु.

वांगी ८० रु.

डांगर ८० रु.

मिरची ८० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

R. Madhvan Parenting Tips: "मुलांना मोकळा वेळ देऊ नका!" आर. माधवनने दिल्या यशस्वी आणि शिस्तबद्ध मुलं घडवण्याच्या टिप्स

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Irregular Sleep Schedules: ८ तास झोपल्यानंतरही बिघडू शकतं का आरोग्य? जाणून घ्या झोपेचं योग्य वेळापत्रक का गरजेचं

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

SCROLL FOR NEXT