Water Tanker (file photo) esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : जिल्ह्यात भीषण टंचाई! टॅंकरची संख्या 400, खर्च 63 कोटी

Nashik News : कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेकडो गावे व वस्त्यांमधील सात लाखांवरील म्हणजे २० टक्के नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. मेअखेर टॅंकरची संख्याही ४०० वर पोचली आहे. मॉन्सून वेळेत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, मॉन्सून वेळेत दाखल न झाल्यास टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर आतापर्यंत तब्बल ६३ कोटींचा खर्च झाला आहे. शासनाकडून टंचाईसाठी निधी प्राप्त झालेला नाही. (Severe water shortage in Nashik district)

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेकडो गावे व वस्त्यांमधील सात लाखांवरील म्हणजे २० टक्के नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी सरकारने आतापर्यंत ६३ कोटी रुपये खर्च केले आहेत. या विभागांच्या पाणीयोजनांचे जलस्त्रोत कोरडे पडल्यामुळे तेथेही टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढावली आहे.

जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस झाला असल्याने पर्जन्यछायेच्या तालुक्यांमध्ये अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३५ लाख असून, त्यापैकी सात लाखांवर म्हणजे २० टक्के लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

यात टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी विहीर अधिग्रहण व टँकर वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या जुलैपासून आतापर्यंत या टँकर व विहीर अधिग्रहणासाठी ६३ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यातील केवळ आठ लाखांची देयके टँकरचालकांना देण्यात आली असून, ५५ कोटींची देयके प्रलंबित आहेत. या देयकांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे. (latest marathi news)

टॅंकर ४०० वर, धरणांनीही गाठला तळ

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणात थोडाच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. ग्रामीण भागातही दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३६० गावे आणि ९३७ वाड्या अशा एकूण एक हजार २९७ गाव-वाड्यांना ३९० टँकरच्या ८७१ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात १४ शासकीय आणि ३७६ खासगी टँकरचा समावेश आहे. या टॅकरद्वारे सहा लाख ७६ हजार ९५४ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टँकर भरण्यासाठी आतापर्यंत तब्बल २०४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात गावांसाठी ६३, तर टँकरसाठी १३५ विहिरींचा समावेश आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यासाठी केवळ दोन टँकर पुरवठादार

जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून दोनच पुरवठादार असून, ते पुरवठादार जिल्ह्याच्या पूर्व भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करतात. या वर्षी पश्चिम भागातील अधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण या तालुक्यांमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तालुकानिहाय टँकरद्वारे पाणी पुरवण्याचा खर्च

नाशिक : १०.८० लाख , चांदवड : ४.१० कोटी, नांदगाव : ३२.१९ कोटी, बागलाण : ३.२८ कोटी, देवळा ः १३.८८ कोटी, मालेगाव : ४.४८ कोटी, येवला : ४.५३ कोटी, सिन्नर : १.३० कोटी. एकूण : ६२.८९ कोटी.

तालुकानिहाय सुरू असलेले टॅंकर

बागलाण (४२), चांदवड (३३), देवळा (३१), इगतपुरी (१६), मालेगाव (४९), नांदगाव (७७), नाशिक (१), पेठ (१६), सुरगाणा (१८), सिन्नर (४६), त्र्यंबकेश्वर (४), येवला (५८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Market Yard Traffic Advisory : बाबा आढाव यांच्या अंत्यदर्शनामुळे मार्केटयार्डात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरते मार्ग बदल!

‘महाडीबीटी’वरील शेतकऱ्यांच्या अर्जांची पूर्वसंमती बंद! ट्रॅक्टरसह सगळ्याच यंत्रांची थांबली खरेदी; निधीची गरज ३१,८३२ कोटींची अन्‌ आहेत अवघे ११८९ कोटी रुपये

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT