Food Distribution
Food Distribution esakal
नाशिक

नाशिककरांचा अन्नदानाकडे कल; 500 ते 1 हजार जणांना दररोज मिळते अन्न

दत्ता जाधव

नाशिक : अन्न हे पूर्णब्रह्म असून, कोणत्याही दानापेक्षा अन्नदान हेच श्रेष्ठदान मानले जाते. कोणतेही दान करताना दात्यांच्या पोटात अन्न असेल तरच करू शकतो. त्यामुळे अन्नदानाला सर्वच संस्कृतीत मोठे महत्त्व दिले जाते. हे महत्त्व ध्यानात घेऊन संत गाडगे महाराज यांनी पन्नास वर्षांपूर्वी नाशिकसह अन्य ठिकाणी अन्नछत्र सुरू केले.

ते अद्याप सुरू आहे. गाडगे महाराज धर्मशाळेसह साईकिरण धाम, श्रीजी प्रसादालय अशा तीन ठिकाणी दररोज पाचशे ते एक हजार भुकेलेल्यांना अन्नदान केले जाते. (Nashikkar tend to donate food 500 to 1 thousand people get free food every day Nashik Latest Marathi News)

रोजगाराच्या शोधार्थ अनेक जण नाशिकमध्ये येतात. मंदीचे वातावरण असल्याने तरुणांच्या हाताला काम नाही, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर कष्टकऱ्यांच्या पोटात दोन घास जावे म्हणून अनेक सेवाभावी संघटना सक्रिय आहेत. शिवाय पितृपक्षातील दानाला आणखी महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत दानाचे महत्त्व सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

श्रीमद् भगवदगीतेत अन्नदानाचे महत्त्व सांगितले आहे. हिंदू धर्मासह जगातील सर्वच धर्मात अन्नदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे, असे धर्मग्रंथांचे अभ्यासक नरेंद्र धारणे यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाकाळात नाशिककरांनी अन्नदानाचे दातृत्व सिद्ध केले आहे. कोरोनामध्ये हाताला काम नसलेले कष्टकरी चालत आपल्या परराज्यातील मूळ गावी निघाले असताना शहराच्या विविध भागात अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. हीच स्थिती जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पाहावयास मिळाली आहे.

कुर्वीत समये दानं कुले कश्र्चिन्न सीदति।
आयु: पुत्रान यश: स्वर्ग कीर्तिं पुष्टिं बलं श्रियम।।
पशुन सौख्यं धनं धान्यं प्राप्रुयात दान।
देवकार्यादपि सदा दानकार्य विशिष्यते।।

अर्थात, आपल्या आर्थिक स्थितीनुसार दान केल्यामुळे मनुष्याला आयु, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, सुख-समृद्धी, धनधान्य प्राप्त होते. यजुर्वेदातील या श्‍लोकाचा हा अर्थ आहे.

गाडगे महाराज धर्मशाळा

स्वच्छतेबरोबरच भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी हे ब्रीद संत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर जपले. १९३० मध्ये महाराजांनी नाशिकमध्ये सुरू केलेले गाडगे महाराज धर्मशाळेतील अन्नछत्र अद्याप सुरू आहे. इथे दररोज दुपारी चारला भुकेलेल्यांना मिष्ठान्नांसह पोटभर भोजन दिले जाते.

(कै.) अशोकराव देशमुख यांच्या निधनानंतर हा वारसा त्यांचा मुलगा कुणाल देशमुख यांच्यासह वसंतराव बोधले, शंकर ठाकरे, सुनील पवार व इतर आजही त्याच तन्मयतेने पुढे नेत आहेत. भुकेलेल्याला अन्न ही संत गाडगेमहाराज यांची शिकवण ८६ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. वृद्ध, अपंगांसह कामधंदा शोधण्यासाठी आलेल्यांना अन्नदान केले जाते, असे श्री. कुणाल यांनी सांगितले.

श्री साईकिरण धाम

रामकुंड परिसरातील चतुःसंप्रदाय आखाड्याशेजारी श्री साईकिरण धाम हे अन्नछत्र आहे. इथे सकाळी आठपासून रात्री उशिरापर्यंत अन्नदान केले जाते. १९५२ मध्ये आजोबा श्री संत उद्धवदास महाराजांनी हे अन्नछत्र सुरू केल्याची माहिती महंत मनोहरबाबा उदासी यांनी दिली. उद्धवदास महाराजांनंतर त्यांचे पूत्र माधवदास व सद्या महंत मनोहर यांचा मुलगा हितेश उदासी यांची चौथी पिढी हे अन्नछत्र दानशुरांच्या मदतीने चालवत आहेत.

कोरोनाकाळात आणि गोदावरीच्या पुरात अन्नदान करण्यात आल्याचे श्री. हितेश यांनी सांगितले. विशेष म्हणजे या अन्नछत्रात दरदिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी करण्यात येतात. केवळ गरजवंत नव्हे, तर बाहेरून आलेले अनेक यात्रेकरू इथे भोजन घेतात, असे महंत मनोहरबाबा यांनी सांगितले. महंत मनोहर उदासी म्हणाले, की माझ्या चौथ्या
पिढीचे कार्य यापुढे अविरतपणे सुरू राहील.

श्रीजी प्रसादालय

पंचवटीतील श्री कपालेश्‍वर मंदिराच्या मागील बाजूस गेल्या अनेक वर्षांपासून श्रीजी प्रसादालय सुरू आहे. नरेंद्रभाई ठक्कर, पप्पूभाई शाह आदी हे अन्नछत्र चालवितात. इथे सकाळी नाश्‍ता, तर सायंकाळी सुग्रास भोजन दिले जाते. हे अन्नछत्र गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असल्याची माहिती पप्पूभाई शाह यांनी दिली. श्री. शाह म्हणाले, की अन्न अन् ज्ञानदान श्रेष्ठ मानले गेले आहे. कुणी उपाशी झोपू नये म्हणून हे अन्नछत्र सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT