Police stop farmers from protesting Written reply from Water Resources Department regarding Bhojapur flood water  esakal
नाशिक

Nashik: आंदोलन करण्यास शेतकऱ्यांना पोलिसांचा मज्जाव; भोजापूरच्या पूरपाण्यासंदर्भात जलसंपदा विभागाकडून पठडीतले उत्तर

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातून पूरपाणी सिन्नरच्या पूर्व भागातील दुशिंगपुर येथील बंधाऱ्यात पोचत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १९) दुपारी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वावी येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. (Police stop farmers from protesting Written reply from Water Resources Department regarding Bhojapur flood water Nashik)

पूरपाणी दुशिंगपूर बंधाऱ्यात आले असते, तर पूर्व भागातील निरहाळे, फुलेनगर, घोटेवाडी कहांडलवाडी या भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटला असता.

मात्र, पूरपाणी नगर जिल्ह्यात वितरित झाले. त्यामुळे वर्षानुवर्षे सिन्नरच्या शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ. विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्व भागातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.

गुरुवारी सकाळी अकराला आंदोलक वावी-निरहाळे रस्त्यावरील समृद्धी अंडरपासजवळ जमा झाले. वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

शेतकरी जमा होऊ लागल्यावर श्री. लोखंडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावले असून, त्यांच्याशी चर्चा करा व चर्चेतून मार्ग निघेल, अशी भूमिका घेतली. दुपारी एकपर्यंत जलसंपदा विभागाचे अधिकारी ‘आलो आलो’, असे उत्तर देत होते.

त्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. शिंदे यांनी पोलिसांचा डोळा चुकवून थेट समृद्धी महामार्गावर धाव घेतली. शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर उभे राहून डॉ. शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकारी काढूपणा करीत असल्याचा आरोप केला.

आपण महामार्ग अडवला, म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांनी तिकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना अटकाव केला. डॉ. शिंदे यांना समृद्धीवरून खाली आणले व वावी पोलिस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध केले.

शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोध करेल त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा श्री. लोखंडे यांनी दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी माघार घेतली.

दुपारी दोनच्या सुमारास जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता सुभाष पगारे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी उशीरा आल्याबद्दल रोष व्यक्त केला. जलसंपदाकडून पूर्व भागातील शेतकऱ्यांना नेहमीच सापत्नपदाची वागणूक देण्यात येते.

यंदा सोडलेले पूरपाणी नगरच्या पुढाऱ्यांनी पळविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. भाऊसाहेब शिंदे, महंत बबनराव सांगळे, सुधाकर शिंदे, गोटिराम सांगळे, विष्णू सांगळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न

अवकाळी पाऊस झाल्यास व भोजापूर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहिल्यास ते पूरपाणी प्राधान्याने दुशिंगपूर बंधाऱ्यासाठी सोडण्यात येईल. पूरपाण्याचे आवर्तन सुरू असेल, तोपर्यंत पाणी शेवटापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची असेल.

पाऊस न पडल्यास येणाऱ्या रब्बी आवर्तनातून २४ तास पाणी दुशिंगपूरच्या चारीला सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन देऊन अभियंता पगारे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT