Due to lack of rain, dried maize became fodder esakal
नाशिक

Nashik Water Crisis: मोसम खोऱ्यात रब्बी हंगाम धोक्यात! जलसाठे कोरडेठाक; खरीप पिकांचेही नुकसान

सकाळ वृत्तसेवा

बिजोरसे : बागलाण तालुक्यासह मोसम खोऱ्यात यंदा पावसाळ्यात फक्त तीन ते चार पाऊस झालेत. शेवटचे दोन महिने नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे जमीन कोरडी पडली आहे.

खरीप हंगामातील पिकांनाच पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरींना पाणी कुठून येणार. पाण्याअभावी यावर्षी रब्बीचा हंगामही धोक्यात येणार असल्याचे चित्र आहे. (Rabi season in danger in Mosam Valley water bodies drying up Damage to kharif crops too nashik )

पावसाळ्यात पुरेसा पाऊस मोसम खोऱ्यात न झाल्याने खरिपातील या भागातील हक्काचे पीक म्हणून लागवड करण्यात आलेल्या मका पिकातून लागवड खर्चही निघणे अवघड झाले आहे. चारा म्हणूनच तो उपयोगात येणार आहे.

बाजरीची ही वाढ खुंटली. कपाशीची तर अगदी बिकट अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकावर होती. मात्र सध्या स्थिती पाहिली तर रब्बी हंगामाचे भवितव्य अंधारात आहे.

यंदाचा परतीचा पाऊस चांगला पडला असता तर रब्बी साठी जमिनीत ओलावा असला असता. पण पाऊस पडला नसल्याने आता रब्बी हंगाम घेणे मुश्कील झाले आहे. एवढेच नाही तर नदी, नाले, पाझर तलाव, विहिरीही कोरडेठाक पडले आहेत.

त्यामुळे रब्बी पिकांची गहू, हरभरा यांची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला उभा आहे. कांदा रोपे तयार आहेत, पण विहिरींनी तळ गाठला आहे. काही शेतकऱ्यांनी शेतजमीन तयार करून ठेवली.

पण शेवटी उत्तर नक्षत्राचा पावसानेही पाठ फिरवली. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला व आर्थिक तूट भरून काढण्याची संधीही निसर्गाने हिरावून घेतली.

"यावर्षी पावसाने दगा दिला. खरिपाची पिके धोक्यात आले. खरिपांच्या पिकांना झालेला खर्चही उत्पादनातून निघालेला नसल्याने शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. आता शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी हंगामाकडे होती पण पाऊस नसल्यामुळे सर्व गणित चुकले."

- वसंत मोरे, शेतकरी बिजोरसे

"विहिरींना पाणी नाही, त्यामुळे गहू हरभरा कांदा लागवड होणे दुरापास्त आहे. कडक ऊन पडत असल्याने जलसाठे कोरडे होत आहेत. अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांदा सडला. शेतकरी पूर्ण कोलमडून गेला आहे."- योगेश पाटील, शेतकरी, काकडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT