Ramadas Athawale
Ramadas Athawale Google
नाशिक

'नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचे नाव द्यावे'

विनोद बेदरकर

नाशिक : ओझर (नाशिक) येथील मधील विमान तळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे. यासंदर्भात दिल्लीत मंत्र्यांना भेटणार असल्याची माहीती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. आठवले आज नाशिकच्या दौऱ्यावर होते दुपारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, विश्वनाथ काळे आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


खासदार आठवले म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत टोलवाटोलवी सुरु आहे. काँग्रेसच्या ६० वर्षाच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झाला नाही. बाकी राज्यात ही ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा,आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. जोपर्यत जातीय व्यवस्था आहे तर आरक्षण असलं पाहिजे. अशीच आमची भूमिका असून केंद्रातील मोदी सरकारच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेले नसतील तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.म्हणून काय त्यांचा आरक्षणाला विरोध आहे असं होतं नाही. मराठा समाजात ज्यांचं उत्पन्न कमी आहे.त्यांना आरक्षण दिल पाहिजे. आमचं फडणवीस सरकार असत तर आम्ही चांगली बाजू मांडली असती. मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारला बाजू मांडता आली नाही


महापालिका निवडणूका भाजपासोबत

केंद्राने राज्यातील चार मंत्र्यांना संधी दिली आहे. त्याचा राज्याला फायदा होईल. स्थानीक स्वराज्य संस्थामध्येही भाजप समर्थक पक्षाचेच सरकार आणायचे आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहे. राज्यात मुंबई नाशिकसह १० मनपा भाजप आणि आम्ही जिंकणार आम्ही भाजप सोबत राहणार आहे. कोरोनामुळे सामान्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. कोरोना काळात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया मधील काही पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.त्यांना ही ५० लाखाच्या विमा मिळावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मागणी करणार आहे. आता तिसरी लाटेची चर्चा आहे. मात्र ही लाट येणारच नाही. याची काळजी घ्यावी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आधीपासून काळजी घ्‍यावी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे.



आघाडी दुबली

देशात सत्ताधारी भाजप विरोधात आघाडी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या बैठकीला किती लोक जातील माहीत नाही.सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे अवघड आहे.एकत्र आले तर मोदींना फायदा होईल. मोदी खमके नेते आहेत. पुढील निवडणूका आम्ही जिंकणार,पश्चिम बंगाल मध्ये भाजपचे मत वाढले. तिथे काँग्रेसला मत नाही मिळालेली नाहीत. सध्या भाजपतर्फे जन आर्शिवाद यात्रा सुरु आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीना
लोकाचा आशीर्वाद मागण्याचा आधिकार आहे. त्यामुळे लोकांपर्यत पोहोचण्यासाठी जन आर्शिवाद यात्रा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारकडून गर्दीबाबत जो बाउ केला जातो आहे. तो चुकीचा आहे. तुम्ही आंदोलन केली तेव्हा कोरोना दिसला नाही का ? असा प्रश्न उपस्थित करीत, श्री आठवले यांनी कोरोनाचा तिसरा टप्पा येईल असं वाटत नाही. अस मत मांडल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT