Manikrao Kokate esakal
नाशिक

Nashik News: ‘जलजीवन’ कामांबाबत तक्रारींचा पाढा; कोकाटेंकडूनही कामांबाबत तक्रारी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामांबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा परिषदेत येऊन तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनीदेखील गुरुवारी (ता.१) जलजीवनच्या कामांबाबत तक्रारी केल्या.

जलजीवन मिशन अंतर्गत सिन्नर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे आराखडे दोषपूर्ण आहेत. ठेकेदारांनी आराखडे तयार केले असून, अधिकाऱ्यांनी केवळ स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

यामुळे या सर्व योजनांची पडताळणी केल्याशिवाय देयके देण्यात येऊ नये व यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे. (Read complaints about Jaljeevan works Complaints about works from Kokat too Nashik News)

याबाबत अॅड. कोकाटे यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांनाही पत्र देत तक्रार केली आहे. गत महिन्यात आमदार कोकाटे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सिन्नर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला होता.

त्या वेळी अनेक पाणीपुरवठा योजनांच्या अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणात दोष आढळले. त्यामध्ये प्रामुख्याने पूर्वीच्या बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे कोरडे स्रोतच भूजल सर्वेक्षण विभागाचे दाखले न घेताच नवीन योजनांसाठी पुन्हा निश्चित केल्याचे दिसून आले.

तसेच, या योजनांची अंदाजपत्रके कुठल्याही तांत्रिक अधिकाऱ्यांनी तयार केलेली नाहीत. ठेकेदारांनीच ग्रामपंचायतीलाही विश्वासात न घेता त्यांच्या सोयीने आराखडे तयार केले आहेत. अंदाजपत्रकानुसार जिल्हा परिषदेने प्रस्ताव मंजूर करून निविदा राबवली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निविदांमध्येही जाणीवपूर्वक बहुतांश ठराविक एजन्सींच्या नावावर १० ते १५ कामे दिली आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या अंदाजपत्रकातील दोषांची तपासणी केली नसल्याने अनेक ठिकाणी अद्याप ठेकेदाराने कामे सुरू केलेली नाहीत, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

त्यामुळे या योजनांसाठी राज्य व केंद्र सरकारचा कोट्यवधींचा निधी वाया जाणार असून, त्याला सर्वस्वी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार राहणार आहेत. यामुळे सिन्नर मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत चुकीच्या पद्धतीने प्रस्तावित केलेल्या प्रत्येक योजनेची सखोल चौकशी तसेच तांत्रिक दोषांची पूर्तता करून सुधारित अंदाजपत्रकास मान्यता घेण्याची आवश्यकता आहे.

योजनांसाठी भूजल सर्वेक्षण प्राधिकरणाचा दाखला घेतल्याशिवाय योजनेच्या कामास सुरवात करू नये. झालेल्या कामाची तपासणी करून समाधानकारक काम झाल्याशिवाय आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची खात्री झाल्याशिवाय झालेल्या कामाची बिले अदा करू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT