sambhaji raje bhosale
sambhaji raje bhosale esakal
नाशिक

'सारथी'तून शाहु महाराजांचे नाव काढा; संभाजीराजे कडाडले!

विक्रांत मते

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या मुद्यावर निकाल दिल्यानंतर केंद्र व राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलतं आहे. मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्द्यावर नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले (sambhaji raje bhosale) बोलतं होते.

सारथीतून शाहु महाराजांचे नाव काढा

सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२० पुर्वी करण्यात आलेल्या नियुक्त्या देण्याच्या सुचना दिल्या आहेत परंतू राज्य सरकार ते देत नाही, छत्रपती शाहु महाराजांच्या नावाने सारथी संस्था स्थापन केली. परंतू त्या संस्थेची स्वायत्तता सरकारने मोडून काढली. तारादूत प्रकल्प मोडीत काढला. त्यामुळे सरकारने सारथी संस्थेला छत्रपती शाहु महाराजांचे दिलेले नाव काढून घ्यावे अशी मागणी खासदार भोसले यांनी करताना राज्य सरकारला जे शक्य आहे किमान ते तरी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी चार वेळा भेट मागितली परंतू अद्यापही ती मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली.

भुमिकेला पाठींबा न दिल्यास ताकद दाखवू

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करून जबाबदारी ढकलतं आहे. परंतू आता मराठा समाजाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. आम्हाला कोर्टाच्या निकालावर मार्ग काय काढणार ते सांगा अशी स्पष्ट ताकीद देताना, राज्यातील मराठा समाजातील जबाबदार घटकांशी चर्चा करून २७ मे नंतर भुमिका निश्‍चित करू त्यानंतर सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी त्या भुमिकेला पाठींबा न दिल्यास ताकद दाखवू त्यासाठी कुठल्याही प्रकारचे आंदोलनाचा स्विकार करू असा ईशारा खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी दिला

२७ तारखे पर्यंत समाजाने शांत राहावे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलतं होते. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या मुद्यावर निकाल दिल्यानंतर केंद्र व राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलतं आहे. मागच्या सरकारने बोगस कायदा केला होता. या सरकारने न्यायालयात व्यवस्थित मांडणी केली नाही या आरोप-प्रत्यारोपांशी मराठा समाजाला काही देणे घेणे नाही. आता आम्हाला मार्ग हवा आहे. तो कसा काढता येईल याची चर्चा करावी. येत्या २७ मे ला मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेवून मराठा समाजची भुमिका मांडणार आहे. राज्यातील खासदार, आमदारांकडे एकचं मागणी आहे. ज्यावेळी भूमिका मांडली जाईल त्यावेळी तुझं-माझं तुझं केले तर याद राखा धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. मी मराठा समाजाचे नेतृत्व करतं नाही समाजातील जबाबदार घटकांशी चर्चा करून समाजाची भुमिका मांडणार आहे. २७ तारखे पर्यंत समाजाने शांत राहावे, राज्य सरकारने नाकारलेल्या आरक्षणातून मार्ग कसा काढता येईल याचा अभ्यास करावा. त्यानंतर जी भुमिका घेतली जाईल त्यातून कदापी माघार घेतली जाणार नाही. समाजाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आडवा गेल्या शिवाय राहणार नाही.

आंदोलन शिकविण्याची गरज नाही

कोरोनामुळे राज्याची परिस्थिती गंभीर आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज यांचा वंशज असल्याने प्रथम लोकांच्या जीवाचा विचार करेन, याचा अर्थ मी आक्रमक नाही असा कोणी करू नये. सन २००७ पासून राज्य पिंजून काढले. समाजाच्या भावना जाणून घेतल्या त्यानंतर मैदानात उतरलो. महाराज शांत आहेत बोलणारे त्यावेळी कुठे होते. आक्रमक होण्यासाठी दोन मिनिटे देखील लागणार नाही. हि सामंज्यसाची भुमिका आहे. कारण नसताना टीम टीम करणायांनी आंदोलन कसे करायचे आम्हाला सांगण्याची गरज नाही असा टोला त्यांनी टिकाकारांना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT