Samadhi-of-Sardar-Vitthal-Narasimha-Vinchurkar esakal
नाशिक

नाशिक : विंचूरमध्ये सरदार विठ्ठल नरसिंहांच्या समाधीचा शोध?

आनंद बोरा

विंचूर (जि.नाशिक) : सहा वेशी अन्‌ तंटबंदीने बंदिस्त विणकरांचे गाव. विंचुरी बांड नावाची साडी पूर्वी प्रसिद्ध होती. गावातील नेहरू चौकात समोर किल्ल्यासारखा दिसणारा वाडा विंचूरकर घराण्याचा इतिहास सांगू लागतो. वाड्यामागे असणाऱ्या अनेक समाध्या लक्ष वेधून घेतात. त्यात विठ्ठल शिवदेवांच्या समाधीचाही समावेश आहे. किशोर गोरे व त्यांचे कुटुंबीय समाधीची देखभाल करतात. तसेच लोणगंगा नदीच्या बाजूला असलेल्या अनेक समाध्यांमध्ये सरदार विठ्ठल नरसिंह विंचूरकरांची समाधी असण्याचा अंदाज इतिहास अभ्यासक संजय बिरार यांनी वर्तविला. मात्र, संशोधनाअंती त्याचा खुलासा होईल. (Samadhi-of-Sardar-Vitthal-Narasimha-Vinchurkar-in-Vinchur-marathi-news-jpd93)

इतिहासाची अनेक दारे खुले होण्याची शक्यता

बिरार यांनी परिसरातील अनेक समाध्यांचा अभ्यास केलाय. त्यानुसार त्यांनी विठ्ठल नरसिंह विंचूरकरांच्या समाधीचा अंदाज वर्तवला आहे. ही समाधी इतर समाध्यांपेक्षा मोठी आहे. या समाधीच्या बाजूला प्राचीन बारव आहे. ग्रामस्थ तिला ‘सतीची बारव’ असे संबोधतात. ‘विंचूरकर यांच्या घराण्याचा इतिहास’ या ग्रंथात उल्लेख आढळतो. त्यामुळे समाधींचे संवर्धन होणे आवश्यक असून, त्यातून इतिहासाची अनेक दारे खुले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विठ्ठल शिवदेव दाणी यांच्याविषयी

विठ्ठल शिवदेव दाणी १७२० च्या सुमारास स्वराज्यच्या सैनात दाखल झाले. १७४४ च्या सुमारास विठ्ठल शिवदेव विंचूरला आले. वाडा बांधून ते इथे राहू लागले. विठ्ठल शिवदेव दाणे विंचूरकर झाले. त्यांच्या पाच मुलांपैकी दोन क्रमांकाचा मुलगा खंडेराव विठ्ठल यांचे दत्तकपुत्र नरसिंह खंडेराव होते. नरसिंह खंडेराव विंचूरकर यांचा १७२९ (इ.स.१८०८) मध्ये मृत्यू झाला. नरसिंह यांची दुसरी पत्नी रमाबाई यांनी ऑगस्ट १८०८ मध्ये कारभारी बळोबाबा व इतर मंडळींनी पेशव्यांच्या परवानगीने दत्तक देऊन विंचूरचे संस्थान त्या दत्तक पुत्राच्या नावाने चालवले. दत्तक घेतलेल्या मुलाचे मूळ नाव केशवराव होते. मात्र, दत्तक घेणाऱ्या आईने त्याचे नाव बदलून विठ्ठलराव ठेवले. पुढे पेशव्यांच्या हुकुमावरून कवायती फौजेबरोबर विठ्ठलराव यांनी अनेक बंड मोडून काढली. इंग्रज व पेशवे यांच्यात युद्धजन्य परिस्थिती उद्‌भवली असताना, विठ्ठलराव पुण्यास हजर झाले. पुढे १८१८ मध्ये पेशव्यांनी इंग्रजांविरुद्ध उभारलेल्या युद्धात इंग्रजांची सरशी झाली. १८३६ च्या जानेवारीत त्यांचा आजाराने विंचूर येथे मृत्यू झाला. विंचूर येथे मृत्यू झाल्याचा उल्लेख विंचूरकर घराण्याचा इतिहास या ग्रंथात पाहायला मिळतो.

अनेक दिवसांपासून विंचूरमध्ये फिरत असताना, मला समाध्या दिसत होत्या. अनेक वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाखाली तीन दगडी समाध्या आहेत. त्यातील एक मोठी आहे, ती विठ्ठल नरसिंह यांची असावी, असे मला वाटते. जवळ प्राचीन बारव आहे. या समाधींचा अभ्यास न झाल्याने इतिहास पुढे येत नाही. त्यासाठी समाध्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. -संजय बिरार, इतिहास अभ्यासक, लासलगाव

विंचूरमध्ये आमच्या शेतात अनेक समाध्या आहेत. त्यातील मुख्य समाधी विठ्ठल शिवदेव यांची असून, त्याची देखरेख व स्वच्छता आम्ही ठेवत आहोत. बाकींच्या समाध्यांचे संशोधन होणे आवश्यक आहे. -किशोर गोरे, शेतकरी

आमच्या वंशजांच्या अनेक समाध्या गावात आहेत, पण त्याचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे कोणती समाधी कुणाची आहे, हे समजत नाही. आता आम्ही या ठिकाणी असलेल्या विंचूरकर संस्थांचे विठ्ठल शिवदेव यांची समाधी स्वःखर्चाने सुशोभित करणार आहोत. -डॉ. नारायण विंचूरकर, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT