Shri shri Ravi Shankar News esakal
नाशिक

Shri Shri Ravishankar: मोदी सत्तेत येण्यापूर्वी काशी, केदारनाथ, राममंदिर दुर्लक्षित : श्री श्री रविशंकर

हजारो भाविकांच्या उपस्थितीत महासत्संग व सामूहिक श्रीरामरक्षापठण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता येईपर्यंत देशातील काशी विश्वेश्वर, केदारनाथ व अयोध्येतील राम मंदिर हे दुर्लक्षित झाले होते. अयोध्येतील राम मंदिराच्या जागेबाबत योग्य तोडगा निघावा म्हणून मी आठ महिने सातत्याने या प्रकरणाचा अभ्यास केला. खटल्याशी संबंधित व्यक्तींना भेटून त्यांच्याशी चर्चा केली.

अखेर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आणि आता अयोध्येत भव्य राममंदिर साकारले जात आहे, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आज येथे केले. (Shri Shri Ravi Shankar on pm narendra modi at samuhik ramraksha at nashik news)

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे मंगळवारी (ता. २८) त्र्यंबकेश्वर रोडवरील ठक्कर डोम येथे ‘ज्ञानगंगा’ हा भक्तिमय सोहळा पार पडला. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या सानिध्यात महासत्संग व सामूहिक श्रीरामरक्षापठण करण्यात आले.

या प्रसंगी १२ ते १५ हजार भाविक उपस्थित होते. या वेळी श्री श्री रविशंकर महाराज म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराच्या संदर्भातील खटला सुरू झाला तेव्हा न्यायाधीशांच्या विनंतीनुसार या खटल्यात सहभाग घेतला.

माझ्यासोबत अन्य दोन न्यायाधीश होते. १८ मोठे बॉक्सनी भरलेल्या या खटल्याचा अभ्यास करण्यासाठी तब्बल दोन वर्षे लागली असती. परंतु आम्ही आठ महिने दररोज आठ ते दहा तास याचा अभ्यास केला. त्याच्याशी निगडित व्यक्तींना भेटलो.

त्यांच्याशी चर्चा केली. अखेर २००३ मध्ये ठरल्याप्रमाणे पंचक्रोशीबाहेर प्रार्थनास्थळ उभारण्यासाठी पाच एकर जागा देण्याचा निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर आता राममंदिर उभे राहात आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, रामायण व महाभारताचा केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रभाव आहे. आठ हजार वर्षांनंतरही हा प्रभाव दिसून येतो. अन्न आणि आनंद मिळविण्यासाठी मशागत करावी लागते. ही मशागत म्हणजे ध्यान आणि प्राणायाम आहे. यातून आपल्या मनातील नकारात्मक विचार बाहेर पडतील.

सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे म्हणजेच ज्ञानगंगा होय. ही ज्ञानगंगा प्रवाही ठेवण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा आपल्याला गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातून मिळत असते. जीवन आनंद आहे.

अन्न व आनंद मिळविण्यासाठी मनुष्य जीवन जगत असतो. ज्ञानगंगा वाहत असली तरी त्याची आपण कदर करत नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू झालेल्या ज्ञानगंगेचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केले. हासत्संग सुरू होण्यापूर्वी उपस्थित सर्वांनी रामरक्षास्त्रोत्र म्हटले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

नकारात्मकतेमुळे ४० सेकंदाला एक आत्महत्या

नकारात्मक विचार मनुष्याचे जीवन संपवतो. अमेरिकेत चार व्यक्तींमागे एक व्यक्ती दुःखी दिसतो. ४० सेकंदात एक व्यक्ती आत्महत्या करत आहे.

पैसा असूनही त्यांच्या जीवनात आनंद नाही म्हणून हे घडते. जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येकाने गीता वाचली पाहिजे. सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी नियमितपणे ध्यान व प्राणायाम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री श्री रविशंकर म्हणतात...

- जीवन नश्वर आहे, एका क्षणात होत्याचे नव्हते होईल

- मिळालेले जीवन आनंदी जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे

- राजाश्रय व दैवाश्रयावर आधारित जीवन

- इंग्रजी भाषेतील ७० टक्के शब्द संस्कृत भाषेतील

- गुढीपाडव्यालाच आपले नवीन वर्ष सुरू होते

- ज्ञान, ध्यान आणि गाण्यापासून आत्मबल वाढते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT