balasaheb thakare.jpg 
नाशिक

बाळासाहेब ठाकरे यांचे 'या' स्मार्ट प्रकल्पास नाव!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जागतिक बॅंक अर्थसहाय्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. हा प्रकल्प आता 'बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प' या नावाने राबविण्यात येईल. 

जागतिक बॅंकेकडून 210 दशलक्ष डॉलर्स इतके कर्ज घेण्यात येणार

प्रकल्पांतर्गत 300 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच दोन हजार 100 कोटींची गुंतवणूक अपेक्षि त आहे. प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेकडून 210 दशलक्ष डॉलर्स इतके कर्ज घेण्यात येणा र आहे. प्रकल्पातून राज्यातील विविध पिकांच्या कार्यक्षम मूल्य साखळ्या विकसित करण्यात येणार आहेत. त्यात संघटित शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी, सरकारी योजना-प्रकल्पांच्या माध्यमातून यापूर्वी संघटित केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करून तो थेट खासगी उद्योजकांना विक्रीसाठी बाजार जोडणी व्यवस्था करण्या चा सरकारचा मानस आहे. 9 सप्टेंबर 2019 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पास मान्यता देण्यात आली. त्यासंबंधीचे आदेश 11 सप्टेंबर 2019 ला जारी झाले. तसेच, संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. 15 जानेवारी 2020 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकी त सप्टेंबरमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली आहे. 

 प्रकल्प कक्ष स्थापन 

प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अधिपत्याखाली 37 अस्था यी पदांसह प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरा वरून प्रकल्पाचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवाय प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने 37 अस्थायी पदांची निर्मिती करण्यात आली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT