Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Nashik News : पाणी कपातीला ठाकरे सेनेचा विरोध; महानगरप्रमुख बडगुजर यांचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ‘अल निनो’ वादळाच्या शक्यतेमुळे यंदा पावसाळा लांबणार असल्याने महापालिका प्रशासनाने पाणी कपातीचे नियोजन केले आहे. मात्र प्रशासनाच्या या भूमिकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाने कडाडून विरोध केला असून, धरणात ५४ टक्के पाणीसाठा असताना नागरिकांना घाबरवण्याचे कारण नाही.

पाणीकपात झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Thackeray Sena opposes water cut Metropolitan Mayor Badgujars warning of agitation Nashik News)

नाशिक महापालिकेने नगर विकास विभागाला अहवाल सादर केला आहे. त्यात ३१ ऑगस्टपर्यंत पाणी साठा जपून वापरण्यासाठी नियोजन आहे. एप्रिल व मे महिन्यात हप्त्यातून एकदा, तर जून महिन्यापासून हप्त्यातून दोनदा पाणी कपात करण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार मंगळवारी (ता. ११) राज्य शासनाकडे बैठक होईल.

त्यानंतर निर्णय घेतला जाईल मात्र त्यापूर्वी पाणी कपातीला सेनेच्या ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी सादर करत कपातीला विरोध केला असून, सदर कपात नाशिककरांवर अन्याय करणारी ठरेल असा दावा केला. कपात केल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

धरणात ५४ टक्के साठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रामुख्याने गंगापूर धरणात ५४ टक्के पाणीसाठा आहे. ६१२ मीटर पाण्याची पातळी आहे, तर पाण्याचा डेड साठादेखील मोठा आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणी कपात करणे योग्य होणार नाही.

सिडको व जुने नाशिकमध्ये पाणी साठवण्याची क्षमता कुटुंबांकडे नाही. अशा परिस्थितीमध्ये तेथे पाणी कपातीचा मोठा परिणाम होईल. मुळात धरणामध्ये भरपूर पाणीसाठा आहे. धरणातच पाणी कमी असते, तर कपातीला हरकत घेण्याचे कारण नव्हते.

त्यामुळे प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठ्यानुसारच नियोजन करावे कपात केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे बडगुजर यांनी सांगितले.

"एक दिवस पाणी कपात केल्यास त्याचा परिणाम पुढील तीन दिवस होतो. धरणात पाणीसाठाच कमी आहे, अशी ही परिस्थिती नाही. धरणातील पाणी पातळीदेखील समाधानकारक आहे. त्यामुळे पाणीकपात करणे योग्य नाही. नागरिकांना प्रशासन घाबरून सोडत आहे. पाणीसाठ्याचा विचार करून कपात होऊ देणार नाही."

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT