नाशिक

महा टीईटी

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- धुळ्यात टीईटी परीक्षेवर राहणार ‘हाय-टेक’ नजर -- जिल्ह्यातील २१ हजार उमेदवार देणार परीक्षा; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : पुणेस्थित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (महा टीईटी) ही परीक्षा जिल्ह्यात पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यावर्षी जिल्ह्यातून २१ हजार २०८ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये पेपर एकसाठी आठ हजार ९३४ उमेदवार तर पेपर दोनसाठी १२ हजार २७४ उमेदवार परीक्षा देतील अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. मनीष पवार यांनी दिली. या परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली ‘परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती’ची बैठक पार पडली. या बैठक दोन्ही अधिकाऱ्यांनी परीक्षेचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश दिले असून, परीक्षा काळात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. - एआय सुरक्षा परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक उमेदवाराची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाईल. डमी उमेदवारांना आळा घालण्यासाठी ‘फेस रेकग्निशन’ व बायोमॅट्रिक हजेरी अनिवार्य असेल. याशिवाय सर्व परीक्षा दालने आणि मुख्य प्रवेशद्वारांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, याचे थेट नियंत्रण जिल्हा सनियंत्रण कक्ष व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मनीष पवार यांच्याकडे असेल. - परीक्षार्थींसाठी सूचना उमेदवारांच्या सुविधेसाठी दर ४८० उमेदवारांमागे एक परीक्षा केंद्र निश्चित केले असून, एका वर्गात २४ परीक्षार्थी असतील. परीक्षार्थींनी परीक्षेला येताना आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड यांपैकी एक मूळ फोटो ओळखपत्र व त्याची सत्यप्रत सोबत ठेवणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल, डिजिटल घड्याळ, कॅल्क्युलेटर, बुर्खा, मास्क किंवा टोपी यांसारख्या प्रतिबंधित वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. पेपर एकसाठी सकाळी १० वाजून १० मिनिटनंतर आणि पेपर दोनसाठी दुपारी दोन वाजूनदहा मिनिट नंतर कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, ज्या दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिक घ्यावयाचा असेल त्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. हा लेखनिक १२ वी पेक्षा जास्त शिकलेला नसून त्याचे वय २८ जूनला १९ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि तो कुटुंबातील सदस्य नसावा. सर्व उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून शांततेत परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व शिक्षणाधिकारी डॉ. मनीष पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: ५१व्या वर्षीही हेल्दी अन् फिट राहण्यासाठी तुकाराम मुंढे फॉलो करतात 'हे' तीन नियम

Nanded Tragedy : अनुकंपा नियुक्तीची स्वप्ने अर्ध्यावरच खंडित; मरखेलच्या मंदार बोधकुले यांचे हृदयविकाराने अकाली निधन

Chandipura Virus: मुंबईत चांदीपुरा विषाणूच्या संसर्गाची भीती, आरोग्य विभाग अ‍ॅक्शन मोडवर; पालिकेच्या रुग्णालयात विशेष कक्ष

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Global Guruji : ‘ग्लोबल गुरुजी’साठी निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण; तेरा केंद्रांवर १,१८७ शिक्षकांची निवड परीक्षा

SCROLL FOR NEXT