traffic problems due to smart cities excavated roads Nashik News
traffic problems due to smart cities excavated roads Nashik News esakal
नाशिक

Smart City | खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचे तीनतेरा

- युनूस शेख

नाशिक : स्मार्टसिटीअंतर्गत (Smart city) सुरू असलेल्या कामांनी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे. वाहतूक कोंडीची सर्वाधिक समस्या निर्माण होत आहे. जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. नियोजनशून्य काम असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

शहराच्या सौंदर्यात वाढ व्हावी, यासाठी स्मार्टसिटीअंतर्गत (Smart City) विविध कामे केली जात असले, तरी नियोजनशून्य कामांमुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीची प्रमुख समस्या जाणवत आहे. पंचवटी, सीबीएस, शालिमार, जुने नाशिक यांसह शहराच्या विविध भागांत स्मार्टसिटीचे कामे सुरू असून, रस्ते खोदून ठेवले आहेत. बहुतांशी ठिकाणी एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी असलेली सिग्नल पूर्ववत सुरू आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. कोंडीने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.

नोकरीवर जाणारे चाकरमाने, महत्त्वाच्या कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना वेळेत नियोजित ठिकाणी जाणे शक्य होत नाही. बऱ्याच वेळेस रुग्णवाहिका (Ambulance), अग्निशमन (Firefighting) दलाचा बंबासह अन्य आपत्कालीन वाहनांना वाहतुकीच्या कोंडीस सामोरे जावे लागत असल्याचे चित्र जागोजागी बघावयास मिळते. पर्यायी मार्ग लांब पल्ल्यांचे असल्याने वाहतुकदारांचे इंधन अधिक खर्चिक होत आहे. त्यांच्या खिशालाही झळ बसत आहे. एकूणच वाहनधारकांसह पायी मार्गक्रमण करणारे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. नको ते स्मार्टसिटीची कामे, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

बेशिस्त वाहतूक पार्किंग

स्मार्टसिटीअंतर्गत कामे सुरू असल्याने कामानिमित्त शहरात येणारे नागरिक व खरेदीसाठी बाजारपेठेत येणारे नागरिक मिळेल त्याठिकाणी आपली वाहने बेशिस्त पार्क करतात. एकीकडे खड्डे, तर दुसरीकडे बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.

व्यवसायावर परिणाम

बाजारपेठ, गावठाण परिसर, शहराचे मुख्य भाग अशा सर्व ठिकाणी स्मार्टसिटीअंतर्गत एकाच वेळी कामे सुरू आहेत. त्याठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. कोंडीपासून वाचण्यासाठी नागरिक पर्यायी मार्ग शोधून कोंडीच्या ठिकाणी खरेदीस जाणे टाळत आहेत. बहुतांशी व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. तीन ते चार दिवस व्यावसायिकांची बोहणी होत नसल्याच्या तक्रारी व्यावसायिक करीत आहेत.

"संथगतीने कामे होत असल्याने अधिक काळ वाहतूक कोंडी राहते. यामुळे ३० ते ४० टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे."

-सुरेश मानसिंघाणी, व्यावसायिक

"वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्मार्टसिटीचे कामे लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत. नियोजनशून्य कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे."

-नितीन पवार, व्यवसायिक

"स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने वेळेत कामाच्या ठिकाणी पोचणे शक्य होत नाही. पर्यायी मार्ग लांब पडत असल्याने पेट्रोल आणि वेळ अधिक वाया जातो."

-जावेद शेख, नागरिक

"वाहतूक कोंडीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. कोंडीमुळे एकमेकांवर वाहणे आढळणे, खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये वाहन फसणे, अशा घटना घडत आहेत. त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे."

-रामा वाघमारे, रिक्षाचालक

"स्मार्टसिटीअंतर्गत कामात होणारा हलगर्जीपणा, एकाच वेळेस सर्वत्र काम सुरू करणे, कामाचे नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे."

-सचिन गायकवाड, रिक्षाचालक

"रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. एकाच वेळी सर्व ठिकाणी कामे सुरू असल्याने गावाला वळसा मारावा लागत आहे."

-शादाब आत्तार, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT