कथरुवंगणवाडी येथे दुर्गंधीयुक्त व गढूळपाणी भरतांना आदीवासी महिला esakal
नाशिक

पावसाच्या माहेरघरीच पाण्याचा वनवा; पाण्यासाठी जीव धोक्यात

हाथ धुने तर सोडाच प्यायला एक घोट पाणी सुध्दा मिळणे कठीण

पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : एकीकडे शासन आदिवासी बांधवांना सर्व सुविधा देण्याची घोषणा करत असतांना मात्र प्रत्येक्षात या बांधवांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे ताजे उदाहरण म्हणजेच पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीतील कथरुवंगण पाड्यातील आदिवासी महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुर्दैव म्हणजे धोकेदायक अशा रेल्वे क्रॉसिंग करुन २ ते ३ टेकड्या चढत जवळपास २ कि.मी. पाण्यासाठी भटकंती करून देखील अतीशय दुर्गंधी युक्त हॉटेल व्यवसायिकांनी वापरलेले पाणी पिण्याची वेळ या आदिवासी बांधवांवर आली आहे.

भर उन्हात पाण्यासाठी भटकंती व जीवमुठीत धरुन रेल्वे क्रॉस करुन जाणाऱ्या महिला

या समस्येला येथील महिला, मुली मेटाकुटीला आल्या आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी या आदिवासी बांधवांची निव्वळ बोळवण करत असल्याने पाणी मागायचे तरी कुणाकडे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे इगतपुरी नगरपरिषद मोठ्या थाटामाटाने २४ तास भावली धरणातून ३२ कोटी रूपये खर्च करून पाणी योजना शहरात सुरु करत आहे. दुसरीकडे कथरूवंगण पाड्याची वेगळीच व्यथा आहे. हाथ धुने तर सोडाच प्यायला एक घोट पाणी सुध्दा येथील बांधवांना मिळेनासे झाले आहे. हा पाडा नगरपरिषदेचे हद्दीत येतो.

२ ते ३ टेकड्या चढत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या मुली व महिला

या पाड्यात एकुण ४५ घरे आहेत ज्यात जवळजवळ २०० लोकवस्ती करुन राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगरपरिषदेने सात वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकित हे पाणी साठवले जाते. पंधरा दिवसात एक वेळा जास्तीत जास्त वीस मिनिटे पाणी पुरवठा केला जातो असे येथील आदिवासी बांधव सांगतात. सध्या तेही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून येथे तळेगाव येथील विहिरीतून पाणी सोडण्यात येते मात्र हे पाणी गढूळ, उंदिर व साप मेलेले आणि केस असलेले पाणी पुरविण्यात येत असल्याचे महिलांनी सांगितले.

सध्या पाड्यावरिल आदिवासी महिला जवळपास दोन किलोमिटर रेल्वेरुळातून जीव धोक्यात घालुन महामार्गावर येथील हॉटेल मधून झिरपणारे पाणी ज्या रेल्वे हद्दीच्या मोरीत जमा होते तेथून आणि पर्यायी महामार्गालगत असलेल्या गढूळ खड्ड्यातून पायपीट करत, जीवावर खेळत पाणी आणत आहे.एका ठिकाणी नैसर्गिक स्त्रोतांतून डबक्यात गढूळ पाणी उपलब्ध होत आहे.तर दुसऱ्या ठिकाणी हॉटेल व्यवसायिकांचे सांडपाणी वापरण्याची वेळ आली आहे. येथील आदिवासी बांधवांनी प्रशासनाने लक्ष्य द्यावे अशी मागणी केली आहे.

उत्तर महाराष्ट्र सह मुंबई सारख्या महानगराची तहान भागवणारा हा इगतपुरी तालुका आज स्वतःच पाण्याविना व्याकुळ झालेला आहे.धरणाचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा हा तालुका,पण आज ह्याच इगतपुरीतील काही गावांची पाड्यांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. कधी गढूळ तर कधी दुर्गंधीयुक्त पाणीच नशिबाला येते.

इथल्या पाड्यांची अवस्था इथले स्थानिक प्रशासन चांगलीच जाणून आहे. मात्र हि अवस्था पालटायला काहीच प्रयत्न होतांना दिसून येत नाही. त्यामुळं यांचा पाण्याचा वनवास कधी संपणार हाच प्रश्न आहे.

"सध्या आम्ही रेल्वेरुळालगतच्या मोरी मधून पाणी आणतो. हे पाणी महामार्ग लगत असलेल्या हॉटेलमधून झिरपते आणि खाली येते.हे पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो.त्यामुळे आमचे लहान मुले नेहमीच आजारी पडतात."

-कल्यानी भालंगे, स्थानिक महिला

"अनेकदा वेळोवेळी निवेदन देऊनही काहीच हालचाल इगतपुरी नगरपरिषदेने केलेली नाही.येथील परिस्थिती नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक सर्वांना कळवली आहे, कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही.मात्र निवङणुका आल्या की मत मागायला येतात."

-अनिल भोईर, स्थानिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT