नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव (corona virus) वाढू नये यासाठी राज्य शासनाने मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने त्वरीत निर्णय बदलावा अशी मागणी भाजपच्या भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आज (ता.१२) नाशिकमध्ये केली. (tushar-bhosale-critisized-state-government-nashik-marathi-news)
पायी वारीला बंदी घालून आघाडी सरकारकडून वारकऱ्यांचा अपमान - आचार्य भोसले
भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, आषाढी वारी हे जागतिक वैभव आहे. परंतू राज्यातील आघाडी सरकारने पायी आषाढी वारीला खोडा घातला आहे. राज्य सरकारने पायी वारीला बंदी घातल्याचा निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही, राज्यातील आघाडी सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. सरकारचा निर्णय धुडकावून, मुक्ताई पालखीचं प्रस्थान होणार करू असे आव्हान त्यांनी सरकारला दिले. पायी वारी व्हावी हि वारकरी संप्रदायाची भावना आहे. सरकारने तातडीने निर्णय बदलावा, अन्यथा राज्यातून अनियंत्रित वाऱ्या निघतील असा ईशारा दिला. त्यानंतर भविष्यात उदभवणाया परिस्थितीला उपमुख्यमंत्री अजीत पवार जबाबदार राहतील. पायी वारीला,निर्बंधांसाहित सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.