niphad 2.jpg
niphad 2.jpg 
नाशिक

"वेड्या मनाला लागलीय घरी परतण्याची आस!" लॉकडाऊनमध्ये 'त्यांचा' टाहो ह्रदयस्पर्शी

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (निफाड) कसबे सुकेणे द्राक्षनगरीत हंगामी रोजगारासाठी आलेल्या दोन हजारावर परप्रांतीय कामगारांना लॉकडाऊनमुळे अडकुन पडावे लागले आहे. मात्र आता द्राक्ष हंगामाची कामे आटोपत आहेत. गावाकडचा कुटुंबकबिला सतत संपर्क करत मायभुमीत येण्याची हाक देतोय तर द्राक्षनगरीत अडकलेल्या दोन हजारावर परप्रांतिय कामगारांचा मायभुमीत परतण्यासाठी एकच टाहो उठत आहे. 

कुटुंबही मुळगावी चिंतेत पडले

खडक, माळेगाव, पालखेड आदी‌ प्रमुख द्राक्ष उत्पादक गावांमध्ये दरवर्षी द्राक्ष हंगामात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथुन व्यापारी व कामगार येतात. त्या त्या गावांमध्ये भाडेतत्वावर खोली घेऊन राहतात. द्राक्ष हंगामात द्राक्षमाल प्रतवारी करणे, पॅकिंग करणे तसेच द्राक्षमाल‌ लोडिंग करणे आदी कामासाठी‌ आलेले आहेत. चालु वर्षी द्राक्ष हंगाम एक महिना उशिराने सुरु झाला हंगाम ऐनभरास आला असतांना लॉकडाऊनच्या निर्णयामुळे आलेल्या हंगामी परप्रांतिय कामगारांना येथेच थांबावे लागले. द्राक्षमालाची काढणीही‌ आटोपल्याने कामगारांना रोजगार तसेच अन्नपाण्याचा प्रश्न तसेच निवासाचे भाडे या कारणांसह कोरोनाबाबत सतत माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे अशा कामगारांचे कुटुंब मुळगावी चिंतेत पडले आहे. सतत मोबाईलद्वारे होणाऱ्या संपर्कामुळे कुटुंबियांची काळजी लागली आहे. 

नाईलाजास्तव थांबलेल्या हंगामी कामगारांना आता लॉकडाऊन उघडण्याची आस आहे. त्यातच प्रशासनाने आमची वैद्यकिय तपासणी करुन प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी होत आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT