Uddhav Thackeray 
नाशिक

Uddhav Thackeray: "शिवसेना संपविण्याचा कट २०१४ मध्येच..."; नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बाळासाहेबांचे निधन झाल्याने आता शिवसेनेचा काय उपयोग? असा विचार करत भाजपने २०१४ मध्येच शिवसेना संपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आमचे ६३ आमदार निवडून आल्याने भाजपवाले घाबरले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले

सकाळ वृत्तसेवा

Uddhav Thackeray News In Marathi

नाशिक: ‘‘शिवसेनेने कठीण काळात भाजपला मदत केली. परंतु, तेच शिवसेना संपवायला निघाले. बाळासाहेबांचे निधन झाल्याने आता शिवसेनेचा काय उपयोग? असा विचार करत २०१४ मध्येच शिवसेना संपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आमचे ६३ आमदार निवडून आल्याने भाजपवाले घाबरले होते,’’ असे प्रतिपादन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.

पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘ गारपीट, अवकाळीत मोदींना महाराष्ट्र आठवला नाही. लोकसभेच्या ४८ जागा असलेला महाराष्ट्र त्यांना आठवू लागल्याने त्यांच्या चकरा वाढल्या आहेत. अवकाळी संकटात गुजरातला १००० कोटी रुपये दिले परंतु महाराष्ट्राला ठेंगा दाखविला. देशासाठी ‘मन की बात’ गुजरातसाठी ‘धन की बात’ असे त्यांचे धोरण आहे. महाराष्ट्र ओरबडण्याचे काम होत आहे. मिंधे सरकार मात्र शेपूट हलवत बसले आहे. आमच्या हक्काचे वैभव आम्ही ओरबडू देणार नाही.’’

‘‘ रामाच्या नावाने मोदी मते मागत आहेत. आपण सांगू तेच विधान, भाजपचे निशाण व मोदी हेच प्रधान अशी वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सर्वाधिक धोका महाराष्ट्राला आहे. परंतु आपल्याकडे लोक सांगतील तोच प्रधान असेल. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या घटनेनुसार व लोकांनी मतपेटीतून निवडून दिलेला प्रधान अशी व्यवस्था आणण्यासाठी गद्दारांना महाराष्ट्र व देशातून हाकलून द्या,’’ असे आवाहन ठाकरे यांनी केले.

ती वेळ आता आली आहे-

‘‘ धर्मावर अधर्माचे संकट आल्यानंतर देवी-देवता अवतार घेऊन राक्षसी प्रवृत्तीचा नाश करतात. ती वेळ आता आली आहे. त्याला कारण म्हणजे आता निवडणुका आल्याने प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागितली जात आहेत. राम मंदिर शिवसेनेच्या अस्मितेचा विषय आहे. राम मंदिराला विरोध नाही. परंतु राम मंदिर उभारणीत शिवसेनेचे योगदान विचारले जाते हे वाईट आहे. शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही,’’ असे ठाकरे यांनी नमूद केले.

त्यांच्यावर कारवाई करणार का?-

‘‘ बाबरी पाडण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हते. शिवसेनाप्रमुखांनी पुढाकार घेतला. हे आमचे योगदान आहे. भाजपने घोटाळेबाज मंत्र्यांना पक्षात घेतले. त्यांनी शंकराचार्यांचा हिंदू धर्माचा संबंध काय? असे वक्तव्य केले. भाजपवाले सनातन धर्म मानत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणार का?’’ असा सवाल ठाकरे यांनी केला. राम मंदिर उद्‍घाटनाच्या
कार्यक्रमात शंकराचार्यांना स्थान नाही परंतु नट-नट्यांना अग्रक्रमाचे स्थान दिले गेले, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT