Vanoli villagers grabbed the sand tractor & handover it to Police esakal
नाशिक

...शेवटी ग्रामस्थांनीच पकडून दिला वाळूचा ट्रॅक्टर | Nashik

रणधीर भामरे

वनोली (जि. नाशिक) : येथे काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी वाळूचा ट्रॅक्टर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. यामुळे परिसरातील वाळू माफियांचे (Valu Mafia) धाबे दणाणले आहे. महसूल विभागाच्या व पोलिस यंत्रणेच्या नाका खालून या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी (Valu Chori) होते. याबाबत संबंधित यंत्रणांना माहिती असून देखील सर्रासपणे डोळेझाक केली जात असल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

स्वयंघोषित पुढारी वाळू चोरीत सक्रिय

वनोली गावातील काही तरुणांनी (Youth) रात्रीचा जागता पहारा देऊन काल अखेर एक ट्रॅक्टर पोलिसांच्या हवाली केला. वनोली गावाच्या परिसरातून कान्हेरी नदी वाहते. या नदीतून मोठ्या प्रमाणात 'गौण खनिज' म्हणजेच वाळूची चोरी होत आहे. यामुळे नदीपात्रातील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. महसूल खात्याशी लागेबांधे असलेले स्वयंघोषित पुढारी या वाळू चोरीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सर्रासपणे हा व्यवसाय सुरू असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India and Oman CEPA: भारत-ओमान करार लागू! होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर ही डील इतकी महत्त्वाची का? उद्योगांसाठी गेमचेंजर ठरणार

Mumbai News: 'वनराणी'ला पर्यटकांची पसंती! पाच महिन्यांत ३६ हजार जनाची सवारी, २९ लाख महसुलाची भर

MBA MMS CET Exam Result : एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल जाहीर; एकूण ८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

Bhimashankar News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून होणार दर्शनासाठी खुले

Vidhan Parishad Election : महायुतीत ‘ऑल इज वेल’चा दावा; पण उमेदवारी अर्जावेळी दोन मंत्री, प्रमुख नेते अन् जिल्हाध्यक्ष अनुपस्थित, कारण काय?

SCROLL FOR NEXT