Winter cold esakal
नाशिक

Winter Cold : उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम; निफाडमध्ये पाच अन् जळगावमध्ये 5.3 अंश सेल्सिअसची नोंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/निफाड : उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१०) कायम राहिली. दिवसभर हुडहुडी भरवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा लागला. निफाडमध्ये दुसऱ्या दिवशी पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

जळगावचा पारा पाच वरून ५.३ अंश सेल्सिअसवर पोचला. त्याचवेळी गेल्या ४८ तासांत नाशिकचे किमान तापमान निम्म्याने घसरून आज ७.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तसेच २४ तासांत नंदुरबारमध्ये पारा २.५ अंश सेल्सिअसने घसरला आणि आज इथे ७.६ अंश सेल्सिअस तापमान राहिले.

नाशिकमध्ये रविवारी (ता. ८) १३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. सोमवारी (ता. ९) ८.७ अंश सेल्सिअस तापमान राहिले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजूनही २४ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी थंडीची लाट ते शीतलहर राहण्याची शक्यता आहे. निफाडमध्ये यंदाचे सर्वांत कमी तापमान राहिले आहे.

१० डिसेंबर २०२२ ला ६.३ अंश सेल्सिअस किमान तापमान राहिल्याने निफाड तालुका थंडीने गारठला होता. त्यानंतर मात्र निफाड तालुक्यात तापमानात चढ-उतार सातत्याने सुरू होते. गेल्या तीन-चार दिवसांत ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांत चिंता पसरली होती.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

निफाडमध्ये कडाक्याच्या थंडीने सकाळी जनजीवन विस्कळित झाले होते. सकाळी रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेकोट्या पेटविल्या होत्या. घसरलेल्या पारामुळे रब्बीमधील गहू, हरभरा, कांदा पिकासाठी फायदा होणार आहे. दुसरीकडे मात्र दिंडोरी, निफाड, नाशिक तालुक्यांत द्राक्षबागांचा हंगाम सुरू होण्याच्या टप्प्यावर असल्याने थंडी द्राक्षबागांच्या मुळावर येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

द्राक्षबागा फुलोरा अवस्थेकडून मणी सेटिंग व परिपक्व होण्याच्या अवस्थेत पोचल्या आहेत. थंडीमुळे तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका आहे. या अवस्थेत द्राक्षबागेतील घडांच्या मण्यांमध्ये गोडवा निर्माण होत असतो. त्यातच तापमान घसरल्याने द्राक्षमण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे.

किमान तापमानाची नोंद

(आकडे अंश सेल्सिअसमध्ये)

- औरंगाबाद- ७.७

- पुणे- ७.४

- राहुरी- ८.१

- नगर- ८.५

''तडे गेलेल्या द्राक्ष मण्यांची विरळणी करण्याचा खर्च वाढणार आहे. कडाक्याच्या थंडीत द्राक्षबागांमध्ये पहाटेच्या वेळी पाणी देणे, शेकोटी पेटवून धूर करणे असे उपाय शेतकऱ्यांना करावे लागत आहेत.'' - ॲड. रामनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT