rahul died well.jpg 
नाशिक

जणू त्या विहीरीत खुणावत होता 'राहूल'चा काळ! क्षणार्धात होत्याचे नव्हते

अजित देसाई

सिन्नर (जि.नाशिक) :  विहिरीच्या कडेला उभे राहून राहून आतील खोदकाम बघत होता. पण अचानक नियतीचा फेरा आला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या घटनेमुळे गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे.

जणू त्या विहीरीत होता 'राहूल'चा काळ
राहुल बाजीराव भगत (वय २८) असे तरुणाचे नाव असून, तो वावीजवळील फुलेनगर येथील रहिवासी होता. वावीत तो भावासोबत गॅरेज व्यवसाय चालवत होता. काही महिन्यांपूर्वी भगत कुटुंबाने वावी शिवारात शेतजमीन विकत घेतली होती. त्या जमिनीत नव्याने विहीर खोदण्याचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास दुकानावर गर्दी नसल्याने विहिरीचे काम बघून येतो, असे सांगून तो शेताकडे गेला. कामावरील मजुरांची जेवणासाठी सुटी झाली होती. ते बाजूला असलेल्या झाडाजवळ जेवण करत होते. विहिरीच्या कडेला उभे राहून आतील खोदकाम बघत असताना राहुलचा अचानक तोल गेला व तो विहिरीत कोसळला.

डॉक्टरांकडून मृत घोषित

कामगारांनी धाव घेत यारीच्या सहाय्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले. सिन्नर येथे खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सिन्नर तालुक्यातील वावी शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना पाहणी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.१६) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT